शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका वाढला

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

पाणी उकळून पिण्याचे आवाहन : जयंती नाल्यातून २०० एमलडी सांडपाणी नदीत

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाईपलाईनच्या कामामुळे गेल्या आठ दिवसांपासून जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगेत सोडण्यात येत आहे. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने जयंती नाला ‘ओव्हर फ्लो’ होऊन दिवसभर नदीत मिसळला. गेल्या २४ तासांत तब्बल २०० (दशलक्ष लिटर) एमएलडीपेक्षा अधिक सांडपाणी प्रक्रियेविनात नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.शहरातील सांडपाणी नदीत मिसळल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर साथींच्या आजारांना नदीकाठच्या गावांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने येत्या काळात राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याचे जूनपर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यामुळे संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे भविष्यात नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.क्लोरिनचे प्रमाण वाढलेमैलामिश्रीत पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे दररोज पाण्यात क्लोरिन टाकण्यात येते. पाणी नदीत मिसळू लागल्यापासून क्लोरिनची मात्रा दुप्पट करण्यात आली. क्लोरिनच्या दुष्परिणामामुळे आजारांचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे.दक्षता घ्यापंचगंगेत मैलामिश्रीत पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.