शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नदीकाठच्या गावांना आरोग्याचा धोका वाढला

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

पाणी उकळून पिण्याचे आवाहन : जयंती नाल्यातून २०० एमलडी सांडपाणी नदीत

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाईपलाईनच्या कामामुळे गेल्या आठ दिवसांपासून जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगेत सोडण्यात येत आहे. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने जयंती नाला ‘ओव्हर फ्लो’ होऊन दिवसभर नदीत मिसळला. गेल्या २४ तासांत तब्बल २०० (दशलक्ष लिटर) एमएलडीपेक्षा अधिक सांडपाणी प्रक्रियेविनात नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.शहरातील सांडपाणी नदीत मिसळल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर साथींच्या आजारांना नदीकाठच्या गावांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने येत्या काळात राधानगरी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याचे जूनपर्यंतचे नियोजन ठरले आहे. त्यामुळे संथ वाहणाऱ्या पंचगंगेमुळे भविष्यात नदीकाठच्या गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.क्लोरिनचे प्रमाण वाढलेमैलामिश्रीत पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे दररोज पाण्यात क्लोरिन टाकण्यात येते. पाणी नदीत मिसळू लागल्यापासून क्लोरिनची मात्रा दुप्पट करण्यात आली. क्लोरिनच्या दुष्परिणामामुळे आजारांचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे.दक्षता घ्यापंचगंगेत मैलामिश्रीत पाणी मिसळत असल्याने या पाण्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यापूर्वी उकळून प्यावे, योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.