शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

शासन विरुद्ध शेतकऱ्यांची दंगल

By admin | Updated: April 17, 2017 01:08 IST

बच्चू कडू : शिरोळ येथे सीएम टू पीएम आसूड यात्रा; सरकार बदलले, पण परिस्थिती नाही

शिरोळ : गेल्या साठ वर्षांत शेतकऱ्यांच्या व्यथा कायम आहेत. जात आणि पात लोकांनी डोक्यातून काढून पंढरपूरच्या वारीला जाणारे लोक जर मुंबईला गेले तर सत्ताधारी, सरकार हडबडेल. साडेतीन लाखांवर आत्महत्या झाल्या, सरकार बदलून पाहिलं, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत बजेट बदलले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन दखल घेत नसेल तर यापुढे शासन व शेतकऱ्यांची दंगल पाहायला मिळेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शिरोळ येथे दिला.शिरोळ येथे शनिवारी शेतकरी आसूड यात्रा सी.एम. टू पी.एम.च्या दरम्यान आयोजित सभेत आमदार कडू बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील होते. आमदार कडू म्हणाले, प्रामाणिकपणे काम केले तर हा लढा यशस्वी होणार आहे. या लढ्यात खासदार राजू शेट्टी जरी सोबत आले तरी त्यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी आमच्यासोबत प्रामाणिकपणे राहिले पाहिजे. २१ एप्रिलला गुजरात येथील वडनगर येथे शेतकरी आसूड यात्रेचा समारोप येईल. पंतप्रधानांना शेतकऱ्यांची शक्ती दाखवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे हित पाहणारे कोणतेच सरकार नाही. आताचे सरकारही आपलं नाही. यामुळे वडनगर येथे होणाऱ्या आसूड मोर्चासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी गेला पाहिजे. या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, बळिराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, कांतिदास अपटे, दिलीप माणगावे, विकास पाटील, कमरुद्दीन पटेल, मंगेश देशमुख, धनाजीराव जगदाळे, मिश्रीलाल जाजू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)