शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

शासन विरुद्ध शेतकऱ्यांची दंगल

By admin | Updated: April 17, 2017 01:08 IST

बच्चू कडू : शिरोळ येथे सीएम टू पीएम आसूड यात्रा; सरकार बदलले, पण परिस्थिती नाही

शिरोळ : गेल्या साठ वर्षांत शेतकऱ्यांच्या व्यथा कायम आहेत. जात आणि पात लोकांनी डोक्यातून काढून पंढरपूरच्या वारीला जाणारे लोक जर मुंबईला गेले तर सत्ताधारी, सरकार हडबडेल. साडेतीन लाखांवर आत्महत्या झाल्या, सरकार बदलून पाहिलं, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत बजेट बदलले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन दखल घेत नसेल तर यापुढे शासन व शेतकऱ्यांची दंगल पाहायला मिळेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शिरोळ येथे दिला.शिरोळ येथे शनिवारी शेतकरी आसूड यात्रा सी.एम. टू पी.एम.च्या दरम्यान आयोजित सभेत आमदार कडू बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील होते. आमदार कडू म्हणाले, प्रामाणिकपणे काम केले तर हा लढा यशस्वी होणार आहे. या लढ्यात खासदार राजू शेट्टी जरी सोबत आले तरी त्यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी आमच्यासोबत प्रामाणिकपणे राहिले पाहिजे. २१ एप्रिलला गुजरात येथील वडनगर येथे शेतकरी आसूड यात्रेचा समारोप येईल. पंतप्रधानांना शेतकऱ्यांची शक्ती दाखवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे हित पाहणारे कोणतेच सरकार नाही. आताचे सरकारही आपलं नाही. यामुळे वडनगर येथे होणाऱ्या आसूड मोर्चासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी गेला पाहिजे. या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, बळिराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, कांतिदास अपटे, दिलीप माणगावे, विकास पाटील, कमरुद्दीन पटेल, मंगेश देशमुख, धनाजीराव जगदाळे, मिश्रीलाल जाजू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)