शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शासन विरुद्ध शेतकऱ्यांची दंगल

By admin | Updated: April 17, 2017 01:08 IST

बच्चू कडू : शिरोळ येथे सीएम टू पीएम आसूड यात्रा; सरकार बदलले, पण परिस्थिती नाही

शिरोळ : गेल्या साठ वर्षांत शेतकऱ्यांच्या व्यथा कायम आहेत. जात आणि पात लोकांनी डोक्यातून काढून पंढरपूरच्या वारीला जाणारे लोक जर मुंबईला गेले तर सत्ताधारी, सरकार हडबडेल. साडेतीन लाखांवर आत्महत्या झाल्या, सरकार बदलून पाहिलं, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत बजेट बदलले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन दखल घेत नसेल तर यापुढे शासन व शेतकऱ्यांची दंगल पाहायला मिळेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शिरोळ येथे दिला.शिरोळ येथे शनिवारी शेतकरी आसूड यात्रा सी.एम. टू पी.एम.च्या दरम्यान आयोजित सभेत आमदार कडू बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील होते. आमदार कडू म्हणाले, प्रामाणिकपणे काम केले तर हा लढा यशस्वी होणार आहे. या लढ्यात खासदार राजू शेट्टी जरी सोबत आले तरी त्यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी आमच्यासोबत प्रामाणिकपणे राहिले पाहिजे. २१ एप्रिलला गुजरात येथील वडनगर येथे शेतकरी आसूड यात्रेचा समारोप येईल. पंतप्रधानांना शेतकऱ्यांची शक्ती दाखवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे हित पाहणारे कोणतेच सरकार नाही. आताचे सरकारही आपलं नाही. यामुळे वडनगर येथे होणाऱ्या आसूड मोर्चासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी गेला पाहिजे. या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, बळिराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, कांतिदास अपटे, दिलीप माणगावे, विकास पाटील, कमरुद्दीन पटेल, मंगेश देशमुख, धनाजीराव जगदाळे, मिश्रीलाल जाजू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)