शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याच्या मरणकळा ‘स्थायी’पर्यंत पोहोचल्याच नाहीत

By admin | Updated: May 24, 2014 01:02 IST

कोल्हापूर : शहराचे वैभव असलेला रंकाळा अखेरची घटका मोजत आहे. संरक्षक तटबंदी कोसळून रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

 कोल्हापूर : शहराचे वैभव असलेला रंकाळा अखेरची घटका मोजत आहे. संरक्षक तटबंदी कोसळून रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तटबंदीसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार आहे. लाखावर निधी उपलब्ध करून देऊ, तातडीने दुरुस्ती करु, अशी पोकळ आश्वासने देण्यात पदाधिकारी दंग आहेत तर दुसरीकडे पैशांअभावी काम रखडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोल्हापूरच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज (शुक्रवारी) महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज गांभीर्याने चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, एकाही सदस्यांने याबाबत ‘ब्र’ही काढला नाही. यावरूनच रंकाळ्याविषयी असलेली पदाधिकार्‍यांची आस्था किती बेगडी आहे व त्यांच्या घोषणा या ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ असल्याचे चित्र स्पष्ट झाले. चार महिन्यांपूर्वी कोसळलेल्या रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूची कोसळलेल्या तटबंदी दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी तटबंदीचा आणखी एक मोठा भाग कोसळला तर चार दिवसांपूर्वी उद्यानाकडील बाजूची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली. याबाबत ठोस उपाययोजना न राबविल्यास उद्यानाकडील तटबंदीचा मोठा भाग पाण्यात कोसळण्याची शक्यता आहे. महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळा तलावास बसत आहे. शालिनी पॅलेससमोरील रंकाळा उद्यान परिसरात तलावाच्या आतील बाजूच्या तटबंदीमधील दोन दगडांना सांधून ठेवणार्‍या सिमेंटचा दर्जा खराब झाल्याने तटबंदीचे दगड कोसळत आहे. नारळाच्या झाडांच्या मुळामुळे तटबंदी धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. मात्र, झाडे न तोडताही तटबंदी सुरक्षित करता येऊ शकते. मात्र, चर्चेपलीकडे महापालिकेत ठोस कारवाईसाठी काहीही होताना दिसत नाही. शालिनी पॅलेससमोरील संपूर्ण तटबंदी वेडी-वाकडी झाली आहे. कोणत्याही क्षणी ही तटबंदी कोसळू शकते इतकी जमीन भुसभुशीत झाली आहे. दगड एकमेकांपासून सुटत आहेत. सुदैवाने तटबंदी कोसळल्याने पर्यटकांच्या जीवितहानी झालेली नाही. मात्र, महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी तलावाच्या तटबंदीचा एक भाग कोसळला होता. त्या कोसळलेल्या भागात सिमेंट कॉँक्रिटच्या साहाय्याने बिम टाकून तटबंदीच्या वरील भागाला आधार दिला आहे. परंतु पाण्याकडील भाग अद्याप दुरूस्त करण्यात आलेला नाही. हे काम पैसे नसल्याने अत्यंत कासवगतीने सुरू आहे. या कोसळलेल्या तटबंदीचे काम अपूर्ण असतानाच त्याच कोसळलेल्या भागापासून पन्नास फुटांवरील काही भाग पुन्हा कोसळला. त्यामुळे ही संपूर्ण तटबंदीच धोकादायक बनली आहे. रंकाळ्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी स्थायी समितीमध्ये ठोस तरतूद होईल, अशी रंकाळाप्रेमींना आशा होती, मात्र, चकार शब्दही बैठकीत सदस्यांनी काढला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)