शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानच्या जमिनीवर कसणाऱ्यांचाच हक्क

By admin | Updated: August 28, 2015 00:07 IST

किसन गुजर : अखिल भारतीय किसान सभा उभारणार राज्यस्तरीय लढा

कोल्हापूर : पुनर्वसन आणि विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रातील देवस्थान समितीच्या जमिनी कसणाऱ्या कुळांकडून काढून घेण्याचे कारस्थान सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे देवस्थानच्या जमिनीवर कसणाऱ्यांचा मालकी हक्क प्रस्थापित होण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यव्यापी लढा उभारण्यात येणार आहे, याची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात येत आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र सचिव किसन गुजर यांनी गुरुवारी दिली.अखिल भारतीय किसान सभेच्या कोल्हापूर कौन्सिलतर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनी कसणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांचा मेळावा शाहू स्मारक भवनात आयोजित केला होता. या मेळाव्यास कोल्हापूर, सांगलीमधून मोठ्या संख्येने खंडकरी शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन गुजर यांच्या हस्ते झाले. यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे जिल्हाध्यक्ष संभाजी यादव होते. ‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, देवस्थानच्या जमिनी या असुरक्षित झालेल्या आहेत. सरकार या जमिनी काढून घेण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी अनेकांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या. डॉ. डी. वाय. पाटील व पतंगराव कदम यांच्या शैक्षणिक संस्थांना बेकायदेशीरपणे देवस्थानच्या जमिनी हस्तांतरित केलेल्या आहेत; पण आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे देवस्थानच्या जमिनी कसत असलेले खंडकरी आणि संबंधित जमिनी यांचे प्रशासकीय रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. या जमिनींचा दर्जा निश्चित केला पाहिजे. उमेश देशमुख म्हणाले, देवस्थानच्या जमिनी या सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरण्याचा उद्योग गावटग्यांनी सुरू केला आहे. विकासाच्या नावाखाली त्या संबंधित कुळांकडून हिरावून घेतल्या जात आहेत. आपल्याच जमिनीमध्ये उपरे होण्याची वेळ कसणाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे ‘कसेल त्याची जमीन’ न्यायाने ही जमीन कसणाऱ्याच्याच मालकीची झाली पाहिजे, यासाठी संघटित लढा उभारणे आवश्यक आहे. ट्रस्टच्या जमिनी कसत असलेल्या खंडकऱ्यांचा मेळावा १६ सप्टेंबरला कऱ्हाड येथे आयोजित केला आहे. यावेळी डॉ. सुभाष जाधव व मिलिंद नारकर यांनी भूमिअधिग्रहण कायद्यास संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन केले. प्रा. आबासाहेब चौगले यांनी लढ्यास ऊसतोडणी कामगार वाहतूक संघटना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. ‘भूमिअधिग्रहण’ शेतकऱ्यांच्या मुळावरनवीन भूूमिअधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे. बागायती जमिनीबरोबरच गायरान, वनजमिनी आणि देवस्थानच्या जमिनी कसणारेही या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात वनजमिनी कसणाऱ्यांसाठी किसान सभेने तीव्र लढा उभा करून या जमिनींवर त्यांची मालकी प्रस्थापित केली होती. या धर्तीवर देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांनाही या जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क मिळावा, यासाठी प्रदीर्घ लढा उभारण्यात येणार आहे, असे गुजर म्हणाले.