शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

देवस्थानच्या जमिनीवर कसणाऱ्यांचाच हक्क

By admin | Updated: August 28, 2015 00:07 IST

किसन गुजर : अखिल भारतीय किसान सभा उभारणार राज्यस्तरीय लढा

कोल्हापूर : पुनर्वसन आणि विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रातील देवस्थान समितीच्या जमिनी कसणाऱ्या कुळांकडून काढून घेण्याचे कारस्थान सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे देवस्थानच्या जमिनीवर कसणाऱ्यांचा मालकी हक्क प्रस्थापित होण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे राज्यव्यापी लढा उभारण्यात येणार आहे, याची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात येत आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र सचिव किसन गुजर यांनी गुरुवारी दिली.अखिल भारतीय किसान सभेच्या कोल्हापूर कौन्सिलतर्फे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनी कसणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांचा मेळावा शाहू स्मारक भवनात आयोजित केला होता. या मेळाव्यास कोल्हापूर, सांगलीमधून मोठ्या संख्येने खंडकरी शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन गुजर यांच्या हस्ते झाले. यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे जिल्हाध्यक्ष संभाजी यादव होते. ‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, देवस्थानच्या जमिनी या असुरक्षित झालेल्या आहेत. सरकार या जमिनी काढून घेण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी अनेकांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या. डॉ. डी. वाय. पाटील व पतंगराव कदम यांच्या शैक्षणिक संस्थांना बेकायदेशीरपणे देवस्थानच्या जमिनी हस्तांतरित केलेल्या आहेत; पण आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे देवस्थानच्या जमिनी कसत असलेले खंडकरी आणि संबंधित जमिनी यांचे प्रशासकीय रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. या जमिनींचा दर्जा निश्चित केला पाहिजे. उमेश देशमुख म्हणाले, देवस्थानच्या जमिनी या सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरण्याचा उद्योग गावटग्यांनी सुरू केला आहे. विकासाच्या नावाखाली त्या संबंधित कुळांकडून हिरावून घेतल्या जात आहेत. आपल्याच जमिनीमध्ये उपरे होण्याची वेळ कसणाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे ‘कसेल त्याची जमीन’ न्यायाने ही जमीन कसणाऱ्याच्याच मालकीची झाली पाहिजे, यासाठी संघटित लढा उभारणे आवश्यक आहे. ट्रस्टच्या जमिनी कसत असलेल्या खंडकऱ्यांचा मेळावा १६ सप्टेंबरला कऱ्हाड येथे आयोजित केला आहे. यावेळी डॉ. सुभाष जाधव व मिलिंद नारकर यांनी भूमिअधिग्रहण कायद्यास संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन केले. प्रा. आबासाहेब चौगले यांनी लढ्यास ऊसतोडणी कामगार वाहतूक संघटना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. ‘भूमिअधिग्रहण’ शेतकऱ्यांच्या मुळावरनवीन भूूमिअधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे. बागायती जमिनीबरोबरच गायरान, वनजमिनी आणि देवस्थानच्या जमिनी कसणारेही या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात वनजमिनी कसणाऱ्यांसाठी किसान सभेने तीव्र लढा उभा करून या जमिनींवर त्यांची मालकी प्रस्थापित केली होती. या धर्तीवर देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांनाही या जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क मिळावा, यासाठी प्रदीर्घ लढा उभारण्यात येणार आहे, असे गुजर म्हणाले.