शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांनी दाद मागायची कोणाकडे?

By admin | Updated: April 7, 2016 00:38 IST

विम्यात वाढ : १५ टक्के सेवाकर; दर ठरविणारी ‘आयआरडीए’ ही संस्था दिल्लीची असल्याने कुचंबणा

कोल्हापूर : सर्वसाधारण विमा कंपन्यांनी १ एप्रिलपासून दुचाकी ते अवजड वाहनांच्या विम्याच्या वार्षिक शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे. या वाढीबरोबरच १५ टक्के सेवाकरही लागू केल्याने रिक्षाचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विमा कंपन्यांचे दर ठरविणारी ‘आयआरडीए’ ही दिल्लीस्थित संस्था असल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर वाहन फिरवायचे म्हटले की, त्या वाहनाचा नियमित विमा असणे कायद्याने बंधनकारक आहे. विम्याशिवाय वाहन चालविल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय त्या वाहनधारकांवर दंडाची किंवा वाहन निलंबित ठेवण्याची कारवाई करते. वाहनाचा अपघात झाल्यास व त्यामध्ये चालकासह प्रवाशांना दुखापत अथवा जीवितास धोका निर्माण झाल्यास विमा कंपनी आपण भरलेल्या विमा पॉलिसीमधून रुग्णालयाचा खर्च अथवा नुकसानभरपाई देते. वाहनाची मोडतोड झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनी देते. त्यामुळे विमा पॉलिसी उतरविणे बंधनकारक आहे. मागील वर्षी रिक्षाचालकांना थर्ड पार्टी विम्यासाठी १३३३ रुपये भरावे लागत होते. यंदा यात ४०० रुपये वाढ केली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना या विम्यासाठी १७३३ रुपये भरावे लागतील. या वाढीचा जिल्ह्यातील १९५०० रिक्षाचालकांवर परिणाम होणार आहे. नियमित विमा भरावयाचा असल्यास पूर्वी खासगी विमा कंपनी ३६०० रुपये आकारत होती; तर सरकारी विमा कंपनी ४८०० रुपये आकारत होती. यात सरकारी विमा कंपनीने तब्बल १२०० रुपयांची वाढ आणि १५ टक्के सेवाकरही आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आधीच डबघाईला आलेल्या रिक्षा व्यवसायाला परमिटचा दंडाचा आणि विमा शुल्क वाढीचा दणका बसणार आहे. भाडेवाढ झाल्याशिवाय ही रक्कम कशी भरून काढायची, असा सवालही रिक्षाचालकांमधून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)रिक्षाचालकांना व्यवसाय करताना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात विमा रकमेत वाढ करून शासनाने मोठा पेच निर्माण केला आहे. विमा रकमेत वाढ केल्यामुळे आता रिक्षाचालकांना घसघशीत वाढ द्यावी. अप्रत्यक्षरीत्या रिक्षाचालकांना प्रवाशांच्या खिशातूनच ही वाढ वसूल करावी लागणार आहे, याचा विचार शासनाने करावा. - अ‍ॅड. बाबा इंदुलकर, कॉमन मॅन रिक्षाचालक संघटनारिक्षाचे विमे कंपन्या भरमसाट आकारतात. मात्र, क्लेम आल्यास तो देताना रिक्षाचालकाचा जीव मेटाकुटीस आणतात. त्यात या कंपन्यांचे विमा दर ठरविणारी अ‍ॅथॉरिटी ही दिल्लीत केंद्राच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न आमच्या रिक्षाचालकांना पडला आहे. - राजू जाधव, रिक्षाचालक सेना, अध्यक्ष्