शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

रिक्षाचालकांचा मोर्चा

By admin | Updated: February 17, 2016 01:20 IST

‘आरटीओ’ कार्यालय : परवाना शुल्कवाढ रद्द करा; कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा इशारा

कोल्हापूर : रिक्षा परवाना नूतनीकरण शुल्कवाढ विरोधी रिक्षाचालकांनी लढा पुकारला असून, मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी रिक्षांसह येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) विराट मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. राज्य शासनाने ही दरवाढ रद्द करावी, रिक्षाचालकांवर कारवाई केल्यास रिक्षा जाग्यावरच रस्त्यावर थांबवून ‘कोल्हापुरी हिसका’ दाखवू, असा इशाराही यावेळी दिला. रिक्षांनी कार्यालयाला घेराव घातल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. परिसरात चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने रिक्षा परवाना नूतनीकरण शुल्कामध्ये केलेल्या अन्यायी दरवाढ निर्णयाविरुद्धचा लढा तीव्र करण्याचा निर्धार कोल्हापुरातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी येथील सासने मैदानावर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, चंडगड येथील रिक्षाचालक एकत्र आले तेथून रिक्षासह मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा आदित्य कॉर्नरमार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर पोहोचला तेथे रिक्षाचालकांनी कार्यालयाला घेरावो घालून रस्ता रोको केला. ‘अन्यायी दरवाढ रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आंदोलकांनी शंखध्वनी केला. रिक्षाचालकांच्या मोर्चाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अडविला. त्यानंतर हे मुख्य प्रवेशद्वार उघडून सर्व रिक्षाचालक मुख्य इमारतीत घुसले. कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या हॉलमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. रिक्षाचालकांनी मागण्यांचे निवेदन देताना, ही दरवाढ रद्द न केल्यास दि. १ मार्चपासून या राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची ठिणगी कोल्हापुरात पडल्याचे सांगितले. एखाद्या रिक्षावर जरी कारवाई केली तर सर्व रिक्षा रस्त्यांवरच थांबविण्याचा व कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा असा इशारा यावेळी चालकांनी दिला. चर्चेवेळी राजेंद्र वर्मा यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना, राज्य शासनाने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याबाबत रिक्षाचालकांच्या भावना शासनास कळवू, असे सांगितले. या शिष्टमंडळात, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव, चंद्रकांत भोसले, न्यू करवीर रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुभाष शेटे, ताराराणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर पंडित, चालक-मालक रिक्षा संघटनेचे राजू पाटील, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यवसाय संघटनेचे मोहन बागडी, कॉमन मॅन संघटनेचे अविनाश दिंडे, आदर्श युनियनचे ईश्वर चन्नी, भाजप रिक्षा संघटनेचे विजय गायकवाड, जयसिंगपूर अ‍ॅटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मौला पटेल, सागर सूर्यवंशी तसेच अरुण घोरपडे, दिलीप सूर्यवंशी, अरुण शिंदे, दत्तात्रय जाधव, भास्कर भोसले, विजय जेधे, किशोर कांबळे, प्रशांत रेडे, केशव माने, तसेच विद्यार्थी वाहतूक संघटनेचे शिवाजी पाटील, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटनेचे वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वाहतुकीची कोंडीया मोर्चामध्ये सुमारे एक हजाराहून अधिक रिक्षा सहभागी झाल्याने मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती, तर कार्यालयाच्या आवारात सुमारे दोन तास रास्ता रोको व घेराव घातल्याने परिसरात वाहतूक ठप्प झाली होती, तसेच ‘आरटीओ’ कार्यालयातील कामकाज कोलमडले होते.