शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

मिरजेत रिक्षाचालकांत संघर्ष

By admin | Updated: June 29, 2015 00:22 IST

टप्पा वाहतूक : परस्परांवर कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

मिरज : मिरजेत टप्पा वाहतुकीवरून तीन आसनी व पॅगो रिक्षाचालकांत संघर्ष निर्माण झाला आहे. परस्परांवर कारवाईसाठी दोन्ही रिक्षाचालकांच्या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून मिरज-सांगली रस्त्यावर पॅगो रिक्षाची टप्पा वाहतूक सुरू असल्याने रिक्षांवर कारवाईसाठी तीन आसनी रिक्षाचालकांच्या जय भारत रिक्षा संघटनेने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मिरज शहरात बसस्थानक, रेल्वेस्थानक, मार्केटपासून टप्पा वाहतूक सुरू आहे. मिरज शहरात पॅगो रिक्षासाठी वेगळे थांबे दिलेले नाहीत. तरीही पॅगोचालक मार्केट, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मिशन हॉस्पिटल या ठिकाणी बेकायदेशीर रिक्षा थांबे निर्माण करून टप्पा वाहतूक करीत असल्याची तीन आसनी चालकांची तक्रार आहे. टप्पा वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षांवर कारवाईच्या मागणीसाठी आठ दिवसात आंदोलन करणार असल्याचे जय भारत संघटनेचे शरीफ काझी, मुबारक कोरबू, समीर सय्यद, इम्तियाज मुल्ला यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात फक्त पॅगो रिक्षाच नव्हे, तर तीन आसनी रिक्षांतून मोठ्याप्रमाणात टप्पा वाहतूक सुरू आहे. कुपवाड, सांगली, मिरज, अंकली, माधवनगर, बुधगाव, हरिपूर या मार्गावर तीन आसनी रिक्षाचालकांकडून टप्पा वाहतूक करण्यात येत आहे. जिल्ह्यात टप्पा वाहतूक करणाऱ्या दोन हजार वाहनांवर कारवाई झाल्यास या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तीन आसनी रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न घेता जादा भाडे घेऊन प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याची पॅगो रिक्षाचालकांची तक्रार आहे. पॅगो व तीन आसनी रिक्षास एकच प्रवासी परवाना असताना, दोन्ही रिक्षांना वेगळे नियम लावता येणार नाहीत. जिल्ह्यात आठ हजार रिक्षांचा परवाना असताना रिक्षांची संख्या त्यापेक्षा दुप्पट आहे. विनापरवाना रिक्षाचालकांवर कारवाई करावी, पॅगो रिक्षांना थांब्यावर थांबून भाडे करण्यास परवानगी द्यावी, तीन आसनी, पॅगो व इतर सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, पॅगो रिक्षांवर अन्यायी कारवाई करण्यात येऊ नये, असे अ‍ॅपे रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, रफिक जमादार, रियाज आवटी, बंडू तोडकर यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)