शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापूरची समृद्ध वन्यजीवसृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:16 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गव्यांसोबतच ग्रेट हॉर्नबिल, करवंदे, भेरली माड म्हणजेच पालम ट्री, सोनघंटा हे फूल, ग्रेट आॅरगन ट्रिप हे फुलपाखरू, स्वच्छ पर्यावरणाचे निर्देशक असलेले देवगांडूळ आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये डारविनी सरडा यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रजातींचे संवर्धन, संशोधन, प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ...

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गव्यांसोबतच ग्रेट हॉर्नबिल, करवंदे, भेरली माड म्हणजेच पालम ट्री, सोनघंटा हे फूल, ग्रेट आॅरगन ट्रिप हे फुलपाखरू, स्वच्छ पर्यावरणाचे निर्देशक असलेले देवगांडूळ आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये डारविनी सरडा यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रजातींचे संवर्धन, संशोधन, प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल कोल्हापूरमध्ये उचलण्यात आलं आहे.कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, चंदगड, पाटगाव, आंबा, गगनबावडा या भागांत मोठं जंगल आहे. त्यामध्ये १६० फुलांच्या जाती, २२५ पक्ष्यांच्या जाती, २२२७ सपुष्पांच्या जाती असल्याची माहिती वनविभागाच्या अभ्यासात समोर आली आहे. या प्रजातींच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतींमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्यानुसार आता पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यासही सुरू झाला आहे. सध्याच्या युगात मानवजातीच्या हस्तक्षेपामुळं वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे; पण कोल्हापूरमध्ये आता नष्ट होणाºया प्रजातींना मानचिन्ह प्रदान करून याच पर्यावरणाच्या संवर्धनाचा प्रयत्न केला जात आहे.कोल्हापूर वन परिक्षेत्रात दोन अभयारण्येकोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, एकूण भौगोलिक क्षेत्र ७६८५ चौरस किलोमीटर आहे. त्यात सद्य:स्थितीत १०८८ चौरस किलोमीटर क्षेत्र घनदाट अरण्य म्हणून, तर खुले वन म्हणून ७०८.८९ चौरस किलोमीटर असे एकूण १७९६ चौरस किलोमीटर इतके वन आहे. या परिक्षेत्रात चांदोली व दाजीपूर अशी दोन अभयारण्ये आहेत. एकूणच हा वन भाग ‘सह्याद्रीचा घाट’ म्हणून ओळखला जातो.या वनक्षेत्राचे वैशिष्ट्यपृष्ठवंशीय अर्थात पाठीचा कणा असलेल्या १६२ प्रजाती, ६८ सर्वसाधारण, २३०० कीटक, टोळवर्गीय आहेत; तर ‘युनेस्को’ने जागतिक जैवविविधता आढळस्थान म्हणून पश्चिम घाटासह या वनक्षेत्राचाही जागतिक वारसा जैवविविधतेत समाविष्ट केला आहे. हॉर्नबिल पक्ष्याच्या संवर्धनासाठी चार प्रजातींचे संवर्धन केले आहे. जगातील सर्व प्रजातींमधील ६० टक्के प्रजाती या वनक्षेत्रात आढळतात.सस्तन प्राणी : १४० प्रजाती, पक्ष्यांच्या ५१० प्रजाती, सरपटणारे प्राण्यांच्या २६० प्रजाती, तर पाण्यात व जमिनीवर अस्तित्व ठेवणाºया १८० प्रजाती या परिसरात आढळतात. शुद्ध पाणी व आॅक्सिजनचा मोठा स्रोेत म्हणून या वनपरिक्षेत्राकडे पाहिले जाते.‘दाजीपूर अभयारण्य’राधानगरी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. ते पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला असून रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वांत पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली आणि त्यावेळी याला ‘दाजीपूर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. तसेच २३५ प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फूलझाडांच्या प्रजाती, तर ३०० औषधी वनस्पती आढळतात. २०१२ मध्ये ‘युनेस्को’ने याला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.आढळणारे प्राणीदुर्मीळ होत चाललेला पट्टेरी वाघ, बिबळ्या, पश्चिम घाटात दुर्मीळ आढळणारे लहान हरीण, गेळा (पिसोरी) यांचा यात समावेश होतो. तसेच गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरू, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर याचबरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.एकूण वनक्षेत्र असेसाल घनदाट जंगल खुले जंगल एकूण जंगल२००१ ११४५ चौ.कि.मी. ६६९.३९ चौ.कि.मी. १८१४ चौ.कि.मी२०१५ ११०३ चौ.कि.मी. ६७९.८९ चौ.कि.मी. १७८२ चौ.कि.मी२०१७ १०८८ चौ. कि.मी. ७०८.५९ चौ. कि.मी. १७९६ चौ.कि.मी.