शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

चंदगडमध्ये भात,नाचणी पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST

गेल्या आठवड्यात म्हाताऱ्या पावसाने चंदगड तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले होते. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, चंदगड तालुक्यात ...

गेल्या आठवड्यात म्हाताऱ्या पावसाने चंदगड तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले होते. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, चंदगड तालुक्यात नदी, नाल्यांमधूनही पाणी बाहेर पडले. बाहेर पडलेले पाणी वाट मिळेल त्या दिशेने गेल्यामुळे नुकताच केलेल्या भात रोप लागवडीसह ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी शेतीच गायब झाली आहे. तर ओढ्याचा प्रवाहच बदलून शेतामधून नवीन ओढा तयार झाला आहे.

चंदगड तालुक्यातील शेतकरी हा ऊस, भात, नाचणी व रताळी या मुख्य पिकांवर अवलंबून आहे. शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल, यासाठी लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनीही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकर कसे होऊन शेतकऱ्यांच्या पदरात मदत कशी पडेल, यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

विम्याबाबत जागृती नसल्याने अडचण

गेल्या काही वर्षापासून पावसाचा अनियमितपणा तर कधी पावसाभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. हे ओळखून काही जागरूक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याचा लाभ फक्त काहीच शेतकऱ्यांना होताे. यामुळे पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे.

फोटो ओळी : चंदगड तालुक्यातील महापुरामुळे अनेक ठिकाणची शेती वाहून गेली असून त्याठिकाणी नदी व नाल्यांमधील दगड-गोट्यांचा खच पडला आहे.

क्रमांक : २६०७२०२१-गड-०१