शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

‘रेरा’तील जाचक अटी रद्द करा -- अविनाश पाटील

By admin | Updated: June 11, 2016 00:28 IST

घर बुकिंगनंतर दोन वर्षांत ताबा बंधनकारक केले. यात दंडात्मक केलेली तरतूद आम्हाला मान्य नाही. ही अट लागू करायची असेल तर परवाने देण्यास विलंब करणाऱ्या सरकारी यंत्रणेलाही यात दोषी धरा.

कोल्हापूर : सरकारने बांधकाम व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या ‘रिअल इस्टेट रेग्युलटरी अ‍ॅक्ट’ अर्थात ‘रेरा’चे स्वागत करू. मात्र, या कायद्यातील जाचक तरतुदींना आपला विरोध कायम राहील. ग्राहकाला दोन वर्षांत घराचा ताबा देण्याच्या अटीवर सरकारने विचार करावा, असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेतर्फे शुक्रवारी येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय परिषदेची बैठक झाली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, सरकार कायदे करताना त्यांची अंमलबजावणी मागील काही वर्षांपासून करते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. सरकारकडून कामगारांकरिता पीपीएफ व ईएसआयसी; रेरा आणि सेवा कर हे चारीही आम्ही स्वीकारले आहेत. त्यात प्रत्येक वेळी बांधकामांना परवानगी देतानाच सेसही कापून घेतला जातो. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही. ‘ईएसआयसी’चे पैसे सरकार कापून घेते; मात्र त्यांची रुग्णालये काही ठिकाणी नाहीत. त्याचा फायदा कामगारांना मिळत नाही. आता रेरा कायद्यांतर्गत बांधकाम कंत्राटदार येत आहेत. घर बुकिंग केल्यानंतर दोन वर्षांत ग्राहकाला ताबा देणे बंधनकारक केले. यात दंडात्मक केलेली तरतूद आम्हाला मान्य नाही. ही अट लागू करायची असेल तर परवाने देण्यास विलंब करणाऱ्या सरकारी यंत्रणेलाही यात दोषी धरा.असोसिएशनचे विश्वस्त शंकरभाई देसाई म्हणाले, सध्या अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. याला सरकारच जबाबदार आहे; कारण एखादे कंत्राटदार, ग्राहक यांना वर्षानुवर्षे परवाने मिळत नाहीत. त्या-त्या कार्यालयाचे हेलपाटे मारून ही मंडळी अक्षरश: थकतात. त्यातूनच मग अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. सरकारने येत्या २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे स्वप्न दाखविले आहे. मात्र, सध्याची बांधकामांची गती पाहता वर्षाला केवळ आठ लाख घरे बांधता येतील, अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने ३० व ६० चौ.मी. घरे उभारल्यास मुद्रांक शुल्क व प्राप्तीकर माफ करू असे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा लाभ द्यायला राज्य सरकार तयार नाही. जमिनीची मर्यादा लक्षात घेता ‘उभी वाढ पद्धती’ अर्थात हॉरिझॉँटल डेव्हलपमेंटला परवानगी देणे आवश्यक आहे. जमिनीची मर्यादा असल्याने किमान २५ मजले इमारती बांधण्यासाठी परवानगी द्यावी. यात अनेक कुटुंबांना घरे मिळतील. राज्य अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, बांधकाम परवाना देताना ‘लेबर सेस’ म्हणून कापून घेतलेला पैसा तसाच पडून आहे. यातील २० टक्के रक्कम कामगारांच्या कल्याणासाठी द्यावी. यात केंद्राचे २४ हजार कोटी, तर राज्याचे ३ हजार ६०० कोटी रुपये पडून आहेत. यावेळी राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे नोंदणी, रेरा कायदा, सेवा कर, अर्बिट्रेशन, महापालिका क्षेत्रातील बांधकाम परवाने, आदींबाबत चर्चा झाली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजीव कृष्णानी, विश्वस्त विजय देवी, कोल्हापूर शाखाध्यक्ष प्रताप कोंडेकर, उपाध्यक्ष सोपान पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)