शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनातील गुन्हे मागे घ्या:संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:50 IST

< p >कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्तीचा विषय संसदेत येऊ दे, त्यावेळी बघा, मी दिल्ली हलवून सोडतो, हे मी राजर्षी शाहूंची शपथ घेऊन सांगतो, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी येथे दिली. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या ...

<p>कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्तीचा विषय संसदेत येऊ दे, त्यावेळी बघा, मी दिल्ली हलवून सोडतो, हे मी राजर्षी शाहूंची शपथ घेऊन सांगतो, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी येथे दिली. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फेबेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी सहाव्या दिवशी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत रोखठोक भूमिका मांडली. यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, प्रसाद जाधव, विनायक फाळके, संदीप पाटील, उमेश पोवार, हेमंत साळोखे, संजय पोवार, गणी आजरेकर व्यासपीठावर उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले, माझी खासदारकी ही बहुजन समाजासाठी असून, या पदाची शपथ घेतल्यानंतर कोपर्डीसह मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडली आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ते शांततेत सुरू असून, अद्याप आपण हातात काठी घेतलेली नाही. सरकारकडून निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यांनी आम्हाला गृहीत धरू नये. आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत आपण करणार नाही, तर संपूर्ण समाजच याचे नेतृत्व करील. त्यामागे आपण राहू.ते पुढे म्हणाले, सरकारने आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत; कारण ते गुन्हेगार नसून समाजाच्या मागण्यांसाठी लढत आहेत. हे गुन्हे जर मागे घेतले नाहीत तर आपण स्वत: रस्त्यावर उतरू. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय लोक एकत्र येत आहेत, हे आनंददायी आहे.आत्ताच मराठाखासदारांनी तोंड उघडलेमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वप्रथम संसदेत आपण आवाज उठविला, त्यावेळी एकाही मराठा खासदाराने तोंड उघडले नाही. आता मात्र जो-तो बोलत आहे, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला.माझे तीन विरोधकसंभाजीराजे यांनी आपल्या भाषणात माझे तीन विरोधक या व्यासपीठावर आहेत, असे म्हणताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यावर पुढे भाषण सुरू ठेवत आपण या विरोधकांना फोन करून काय केले पाहिजे, असे विचारले.