शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यात जैवविविधतेचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: July 23, 2016 00:52 IST

जैवविविधता समितीचा निर्णय : तलावातील पाणी वाहून जाऊ नये, यासाठी बंधाऱ्यात बरगे घालण्याचे आदेश--लोकमतचा प्रभाव

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या जैवविविधता समितीची पहिली बैठक शुक्रवारी महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. यंदा कळंबा तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने त्यामधील संपूर्ण जैवविविधता उदाहरणार्थ मासे, कासव, शिंपला, पाणवनस्पती नष्ट झाल्या आहेत. आता पावसाळ्यात कळंबा तलाव पुन्हा तुडुंब भरल्याने जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.महापौर अश्विनी रामाणे यांनी समितीमार्फत वर्षभरात एखादे चांगले काम करून दाखवूया, असे सांगून कळंबा तलावातील वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी बंधाऱ्यात बरगे (फळ्या) घालण्याचे आदेश दिले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी जैवविविधता कायद्याप्रमाणे या विषयाची नोंदवही करण्याचे व शहरातील जैवविविधतेने समृद्ध ठिकाणे निश्चितीचे आदेश दिले.गटनेते शारंगधर देशमुख यांनी परताळा व रंकाळा तलावांतील मासेमारीच्या न काढलेल्या जाळ्यांचा विषय उपस्थित केला. तसेच रंकाळ्यातील पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस थांबल्याने आता ते अडविण्यात यावे; अन्यथा पाणी पातळी जलदगतीने कमी होईल, असे त्यांनी सांगितले. सत्यजित कदम यांनी मत्स्यबीजांसह मासेमारीचा ठेका देण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली. विजय सूर्यवंशी यांनी शहरात इतरही तलाव आहेत; त्यांचा डीपीआर तयार करण्यात यावा, अशी सूचना मांडली. सूरमंजिरी लाटकर यांनी पक्षांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याबरोबरच वादळात न पडणाऱ्या जातींचे वृक्षारोपण करण्याची सूचना केली. जैवविविधता समितीचे सदस्य अमर जाधव यांनी माशांच्या विविध जातींची माहिती दिली. यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, अनिल चौगुले, डॉ. नीलिशा देसाई,डॉ. डी. एस. पाटील, बाळासाहेब कांबळे, उपवनसंरक्षक कार्यालयाचे देवदास खडके, आर. के. पाटील, प्रतिभा राजेभोसले, आदी उपस्थित होते.शासनाकडून निधीसाठी प्रयत्न व्हावाउदय गायकवाड यांनी जैवविविधता समितीचे महत्त्व, गरज व उद्देश यांबद्दल सविस्तर माहिती देऊन शासनाकडून निधीसाठी प्रयत्न करता येईल, असे सांगितले. तसेच कळंबा तलावात विविध जातींचे मासे, कासव, खेकडे, शंख, शिंपले सोडण्याची गरज आहे. यासाठी मत्स्यबीज विभागाशी पत्रव्यवहार करून विविध प्रकारचे मासे तलावात सोडण्यात यावेत व मासे सोडल्यानंतर एक वर्ष मासेमारीसाठी बंदी घालण्यात यावी, अशी सूचना केली.