शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यात जैवविविधतेचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: July 23, 2016 00:52 IST

जैवविविधता समितीचा निर्णय : तलावातील पाणी वाहून जाऊ नये, यासाठी बंधाऱ्यात बरगे घालण्याचे आदेश--लोकमतचा प्रभाव

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या जैवविविधता समितीची पहिली बैठक शुक्रवारी महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. यंदा कळंबा तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने त्यामधील संपूर्ण जैवविविधता उदाहरणार्थ मासे, कासव, शिंपला, पाणवनस्पती नष्ट झाल्या आहेत. आता पावसाळ्यात कळंबा तलाव पुन्हा तुडुंब भरल्याने जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.महापौर अश्विनी रामाणे यांनी समितीमार्फत वर्षभरात एखादे चांगले काम करून दाखवूया, असे सांगून कळंबा तलावातील वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी बंधाऱ्यात बरगे (फळ्या) घालण्याचे आदेश दिले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी जैवविविधता कायद्याप्रमाणे या विषयाची नोंदवही करण्याचे व शहरातील जैवविविधतेने समृद्ध ठिकाणे निश्चितीचे आदेश दिले.गटनेते शारंगधर देशमुख यांनी परताळा व रंकाळा तलावांतील मासेमारीच्या न काढलेल्या जाळ्यांचा विषय उपस्थित केला. तसेच रंकाळ्यातील पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस थांबल्याने आता ते अडविण्यात यावे; अन्यथा पाणी पातळी जलदगतीने कमी होईल, असे त्यांनी सांगितले. सत्यजित कदम यांनी मत्स्यबीजांसह मासेमारीचा ठेका देण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली. विजय सूर्यवंशी यांनी शहरात इतरही तलाव आहेत; त्यांचा डीपीआर तयार करण्यात यावा, अशी सूचना मांडली. सूरमंजिरी लाटकर यांनी पक्षांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याबरोबरच वादळात न पडणाऱ्या जातींचे वृक्षारोपण करण्याची सूचना केली. जैवविविधता समितीचे सदस्य अमर जाधव यांनी माशांच्या विविध जातींची माहिती दिली. यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, अनिल चौगुले, डॉ. नीलिशा देसाई,डॉ. डी. एस. पाटील, बाळासाहेब कांबळे, उपवनसंरक्षक कार्यालयाचे देवदास खडके, आर. के. पाटील, प्रतिभा राजेभोसले, आदी उपस्थित होते.शासनाकडून निधीसाठी प्रयत्न व्हावाउदय गायकवाड यांनी जैवविविधता समितीचे महत्त्व, गरज व उद्देश यांबद्दल सविस्तर माहिती देऊन शासनाकडून निधीसाठी प्रयत्न करता येईल, असे सांगितले. तसेच कळंबा तलावात विविध जातींचे मासे, कासव, खेकडे, शंख, शिंपले सोडण्याची गरज आहे. यासाठी मत्स्यबीज विभागाशी पत्रव्यवहार करून विविध प्रकारचे मासे तलावात सोडण्यात यावेत व मासे सोडल्यानंतर एक वर्ष मासेमारीसाठी बंदी घालण्यात यावी, अशी सूचना केली.