शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महसुली कायद्यात बदल करणार : खडसे

By admin | Updated: June 20, 2015 00:51 IST

सात-बारा न पाहता शेतकऱ्यांना एक लाख कर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटनकोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या महसुली कायद्यात लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुुक्रवारी येथे बोलताना दिली. राज्यात शेतसारा भरला नाही म्हणून सरकारने ताब्यात घेतलेल्या शेतजमिनी मूळ मालकांना परत देण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन तसेच ‘इ डिस्निक’ आज्ञावलीचा शुभारंभ समारंभात महसूलमंत्री खडसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते. महसूल विभागाशी संबंधित कुळ, ‘ब सत्ता’, इनामी व लीज कायद्यातील काही चुकीच्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास )सात-बारा न पाहता शेतकऱ्यांना एक लाख कर्ज कोल्हापूर : अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर अनेक नोंदी असल्याने त्यांना कर्ज मिळत नाही. यासाठी सात-बारा न पाहता एक लाखापर्यंत व्यक्तिगत कर्ज देणार असल्याची घोषणा महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. / वृत्त २ होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. शंभर वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारे हे कायदे आता कालबाह्ण ठरत आहेत. जर अशा कायद्यांमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार असेल तर ते बदलावे लागतील. आमच्या सरकारने तसा निर्णय घेतला असून लवकरच ते बदलण्यात येतील, असे खडसे म्हणाले. शंभर रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंतचा शेतसारा भरला नाही म्हणून महसूल विभागाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनीवर आपले नाव लावून त्या कागदोपत्री ताब्यात घेतल्या आहेत. अशा जमिनी कोल्हापूर जिल्ह्णातही आहेत. अशा शेतकऱ्यांचा सारा माफ करून ताब्यात घेतलेल्या जमिनी मूळमालकांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा विचार आहे, असे खडसे यांनी सांगितले. राज्यातील अडीच एकरांच्या खाली शेतजमिनीचे तुकडे पाडले जात नाहीत. त्यामुळे जमिनीचा मालक असूनही त्यांना ७/१२ चा उतारा न मिळाल्याने लाखो शेतकऱ्यांची कुचंबणा होते म्हणून राज्यातील ‘तुकडे बंदी’चा कायदा रद्द करण्याचा निर्णयही सरकार घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मोजणीबाबतहीकडक नियमशेतकऱ्यांच्या मोजणीबाबत राज्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मोजणीची प्रक्रिया खूप दिवस सुरू असते त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा त्रास होतो म्हणूनच आता ही प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. मोजणीकरीता नागरिकांना एक तारीख व वेळ दिली जाईल. त्या दिवशी मोजणी झालीच पाहिजे. जर झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व्हिस बुकावर त्याची नोंद करण्यात येईल. मागच्याच आठवड्यात याबाबत निर्णय घेतला आहे, असे खडसे म्हणाले. प्रारंभी मंत्री खडसे यांनी कोनशिलेचे अनावरण केले. दीपप्रज्वलनाने समारंभास सुरुवात झाली.जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रास्ताविक केले. हातकणंगले, शिरोळ, चंदगड व आजरा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी ७.२४ कोटींचा निधी मिळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभसंदेश वाचून दाखविला. समारंभास खासदार संजयकाका पाटील, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, संध्यादेवी कुपेकर, सुचित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील आदी उपस्थित होते.