शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उघडीपीचा दिलासा, पण पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम ...

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम असून पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाणी तुंबलेले असून लष्कराच्या जवानांनी शिरोळ तालुक्यात बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र पुणे, रत्नागिरी, बेळगाव, सावंतवाडी अशा चारही मार्गांवर पाणी आल्याने कोल्हापूरची चोहोबाजूंनी रस्ता कोंडी झाली आहे.

गुरुवारी रात्रीपासून पाणी वाढायला सुरुवात होऊन शुक्रवारी रात्री राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५६ फुटांवर पोहोचली. या ठिकाणी ४३ फूट ही धोका पातळी आहे. परंतु शुक्रवारी रात्री १२ नंतर पावसाचा जोर ओसरला. शनिवारी सकाळी तर कोल्हापुरात कडक ऊन होते. दिवसभर पाऊस न झाल्याने तुंबून राहिलेल्या पाण्यामध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट रात्री ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी होऊन ती ५४ फुटांवर आली. याच पद्धतीने जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने महापुराची तीव्रता कमी होईल, असा आशावाद आहे.

शहरातील शाहुपुरी, कुंभार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, न्यू पॅलेस शेजारील परिसर, कसबा बावड्याच्या परिसरात अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर असून शनिवारीही दिवसभर या ठिकाणी अनेक नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांना शनिवारीही बाहेर काढण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर जिल्हा परिषदेत बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला. लष्कराचे जवान, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या कामाचे पाटील यांनी कौतुक केले.

.........

दृष्टिक्षेपात महापूर

१ पूरग्रस्त ७६ हजार २६ व्यक्तींचे स्थलांतर

२ नातेवाईक यांच्याकडे ६७ हजार १११

३ निवारा कक्षात ८ हजार ९१२

४ छावणीमध्ये कोविड रूग्ण स्थलांतरित ४२

५ स्थलांतरित जनावरे- २५ हजार ५७३

६ पूरबाधित गावे ३६६

७ आतापर्यंत जीवित हानी ७ व्यक्ती

८ लहान -मोठ्या एकूण २७ जनावरांचा मृत्यू

९ गर्भवती ९० महिलांचे स्थलांतरण. पैकी ४ महिलांची यशस्वीरित्या प्रसूती

.............

धरणक्षेत्रात शनिवारपर्यंत झालेला पाऊस व याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे-

राधानगरी- २६००/ १९००

तुळशी- २८४४/१०९८

कासारी- २७१७/ १७९७

कुंभी- ४३५२/ ३५९७

कोल्हापूर- ९४३/ ४२७

.........

दिव्यांगांना अनुदान

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.