शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उघडीपीचा दिलासा, पण पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम ...

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम असून पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाणी तुंबलेले असून लष्कराच्या जवानांनी शिरोळ तालुक्यात बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र पुणे, रत्नागिरी, बेळगाव, सावंतवाडी अशा चारही मार्गांवर पाणी आल्याने कोल्हापूरची चोहोबाजूंनी रस्ता कोंडी झाली आहे.

गुरुवारी रात्रीपासून पाणी वाढायला सुरुवात होऊन शुक्रवारी रात्री राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५६ फुटांवर पोहोचली. या ठिकाणी ४३ फूट ही धोका पातळी आहे. परंतु शुक्रवारी रात्री १२ नंतर पावसाचा जोर ओसरला. शनिवारी सकाळी तर कोल्हापुरात कडक ऊन होते. दिवसभर पाऊस न झाल्याने तुंबून राहिलेल्या पाण्यामध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट रात्री ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी होऊन ती ५४ फुटांवर आली. याच पद्धतीने जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने महापुराची तीव्रता कमी होईल, असा आशावाद आहे.

शहरातील शाहुपुरी, कुंभार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, न्यू पॅलेस शेजारील परिसर, कसबा बावड्याच्या परिसरात अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर असून शनिवारीही दिवसभर या ठिकाणी अनेक नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांना शनिवारीही बाहेर काढण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर जिल्हा परिषदेत बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला. लष्कराचे जवान, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या कामाचे पाटील यांनी कौतुक केले.

.........

दृष्टिक्षेपात महापूर

१ पूरग्रस्त ७६ हजार २६ व्यक्तींचे स्थलांतर

२ नातेवाईक यांच्याकडे ६७ हजार १११

३ निवारा कक्षात ८ हजार ९१२

४ छावणीमध्ये कोविड रूग्ण स्थलांतरित ४२

५ स्थलांतरित जनावरे- २५ हजार ५७३

६ पूरबाधित गावे ३६६

७ आतापर्यंत जीवित हानी ७ व्यक्ती

८ लहान -मोठ्या एकूण २७ जनावरांचा मृत्यू

९ गर्भवती ९० महिलांचे स्थलांतरण. पैकी ४ महिलांची यशस्वीरित्या प्रसूती

.............

धरणक्षेत्रात शनिवारपर्यंत झालेला पाऊस व याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे-

राधानगरी- २६००/ १९००

तुळशी- २८४४/१०९८

कासारी- २७१७/ १७९७

कुंभी- ४३५२/ ३५९७

कोल्हापूर- ९४३/ ४२७

.........

दिव्यांगांना अनुदान

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.