शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

उघडीपीचा दिलासा, पण पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम ...

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम असून पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाणी तुंबलेले असून लष्कराच्या जवानांनी शिरोळ तालुक्यात बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र पुणे, रत्नागिरी, बेळगाव, सावंतवाडी अशा चारही मार्गांवर पाणी आल्याने कोल्हापूरची चोहोबाजूंनी रस्ता कोंडी झाली आहे.

गुरुवारी रात्रीपासून पाणी वाढायला सुरुवात होऊन शुक्रवारी रात्री राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५६ फुटांवर पोहोचली. या ठिकाणी ४३ फूट ही धोका पातळी आहे. परंतु शुक्रवारी रात्री १२ नंतर पावसाचा जोर ओसरला. शनिवारी सकाळी तर कोल्हापुरात कडक ऊन होते. दिवसभर पाऊस न झाल्याने तुंबून राहिलेल्या पाण्यामध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट रात्री ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी होऊन ती ५४ फुटांवर आली. याच पद्धतीने जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने महापुराची तीव्रता कमी होईल, असा आशावाद आहे.

शहरातील शाहुपुरी, कुंभार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, न्यू पॅलेस शेजारील परिसर, कसबा बावड्याच्या परिसरात अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर असून शनिवारीही दिवसभर या ठिकाणी अनेक नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांना शनिवारीही बाहेर काढण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर जिल्हा परिषदेत बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला. लष्कराचे जवान, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या कामाचे पाटील यांनी कौतुक केले.

.........

दृष्टिक्षेपात महापूर

१ पूरग्रस्त ७६ हजार २६ व्यक्तींचे स्थलांतर

२ नातेवाईक यांच्याकडे ६७ हजार १११

३ निवारा कक्षात ८ हजार ९१२

४ छावणीमध्ये कोविड रूग्ण स्थलांतरित ४२

५ स्थलांतरित जनावरे- २५ हजार ५७३

६ पूरबाधित गावे ३६६

७ आतापर्यंत जीवित हानी ७ व्यक्ती

८ लहान -मोठ्या एकूण २७ जनावरांचा मृत्यू

९ गर्भवती ९० महिलांचे स्थलांतरण. पैकी ४ महिलांची यशस्वीरित्या प्रसूती

.............

धरणक्षेत्रात शनिवारपर्यंत झालेला पाऊस व याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे-

राधानगरी- २६००/ १९००

तुळशी- २८४४/१०९८

कासारी- २७१७/ १७९७

कुंभी- ४३५२/ ३५९७

कोल्हापूर- ९४३/ ४२७

.........

दिव्यांगांना अनुदान

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.