शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

उघडीपीचा दिलासा, पण पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम ...

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम असून पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाणी तुंबलेले असून लष्कराच्या जवानांनी शिरोळ तालुक्यात बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र पुणे, रत्नागिरी, बेळगाव, सावंतवाडी अशा चारही मार्गांवर पाणी आल्याने कोल्हापूरची चोहोबाजूंनी रस्ता कोंडी झाली आहे.

गुरुवारी रात्रीपासून पाणी वाढायला सुरुवात होऊन शुक्रवारी रात्री राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५६ फुटांवर पोहोचली. या ठिकाणी ४३ फूट ही धोका पातळी आहे. परंतु शुक्रवारी रात्री १२ नंतर पावसाचा जोर ओसरला. शनिवारी सकाळी तर कोल्हापुरात कडक ऊन होते. दिवसभर पाऊस न झाल्याने तुंबून राहिलेल्या पाण्यामध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट रात्री ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी होऊन ती ५४ फुटांवर आली. याच पद्धतीने जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने महापुराची तीव्रता कमी होईल, असा आशावाद आहे.

शहरातील शाहुपुरी, कुंभार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, न्यू पॅलेस शेजारील परिसर, कसबा बावड्याच्या परिसरात अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर असून शनिवारीही दिवसभर या ठिकाणी अनेक नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांना शनिवारीही बाहेर काढण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर जिल्हा परिषदेत बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला. लष्कराचे जवान, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या कामाचे पाटील यांनी कौतुक केले.

.........

दृष्टिक्षेपात महापूर

१ पूरग्रस्त ७६ हजार २६ व्यक्तींचे स्थलांतर

२ नातेवाईक यांच्याकडे ६७ हजार १११

३ निवारा कक्षात ८ हजार ९१२

४ छावणीमध्ये कोविड रूग्ण स्थलांतरित ४२

५ स्थलांतरित जनावरे- २५ हजार ५७३

६ पूरबाधित गावे ३६६

७ आतापर्यंत जीवित हानी ७ व्यक्ती

८ लहान -मोठ्या एकूण २७ जनावरांचा मृत्यू

९ गर्भवती ९० महिलांचे स्थलांतरण. पैकी ४ महिलांची यशस्वीरित्या प्रसूती

.............

धरणक्षेत्रात शनिवारपर्यंत झालेला पाऊस व याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे-

राधानगरी- २६००/ १९००

तुळशी- २८४४/१०९८

कासारी- २७१७/ १७९७

कुंभी- ४३५२/ ३५९७

कोल्हापूर- ९४३/ ४२७

.........

दिव्यांगांना अनुदान

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.