शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘टोल’चा निकाल दिवाळीपूर्वी ?

By admin | Updated: October 1, 2014 01:17 IST

सुनावणी संपली : कोल्हापूरकरांची उत्सुकता पुन्हा ताणली

कोल्हापूर : रस्ते प्रकल्पाचा चुकीच्या पद्धतीने झालेला करार, ‘आयआरबी’ला कवडीमोलाने दिलेली जागा, कंपनीने एक कोटी रुपयांची जादा दिलेली बॅँक गॅरंटी, टोलसाठी होणारा विरोध, आदी मुद्द्यांवर आज, मंगळवारी उच्च न्यायालयात कोल्हापूरच्या टोलप्रश्नी चर्चा झाली. याचिकाकर्ते, राज्य शासन, महापालिका, आयआरबी व रस्ते विकास महामंडळ, आदींनी न्यायालयात म्हणणे सादर केले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी व ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने सुनावणी संपल्याने जाहीर केले. न्यायालय सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून दिवाळी सुटीपूर्वी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे.टोलप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानेच सोमवार (दि. २९) पासून दोन दिवसांची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. सकाळच्या सत्रात सुभाष वाणी, शिवाजीराव परुळेकर व अमर नाईक यांच्यातर्फे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी म्हणणे मांडले. टेंबलाईवाडी येथील ३६ हजार चौरस मीटरची जागा ‘आयआरबी’ला देण्याची घाई रस्ते महामंडळाने केली. या जागेवर पूर्वी टिंबर मार्केट व सध्या मैदानाचे आरक्षण आहे. टोलची मुदत ३० वर्षे, तर जागा मात्र ९९ वर्षे कराराने नाममात्र एक रुपया वार्षिक भाड्याने देण्यात आली. अशा प्रकारे नागरी मालमत्तेचा विचार न करता चुकीचा करार केला आहे. हा करारच बेकायदेशीर असल्याने टोल रद्द करावा, अशी मागणी अ‍ॅड. नेवगी यांनी केली.सरकारी वकील वैजयानी यांनी शासनाची बाजू मांडली. त्यांनी ‘सोव्हिल’ या सल्लागार कंपनीच्या प्रमाणपत्राच्या आधारेच शासनाने टोलवसुलीस परवानगी दिल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. रस्ते महामंडळाचे वकील अजित चव्हाण यांना न्यायालयाने ९९ वर्षांच्या कराराने जागा देण्यापूर्वी रस्ते महामंडळाने नागरी हिताचा विचार का केला नाही? अशी विचारणा केली.‘आयआरबी’चे वकील जनक द्वारकादास यांनी कंपनीने २४ कोटी रुपयांच्या अपूर्ण कामांसाठी २५ कोटी रुपयांची बॅँक गॅरंटी महापालिकेकडे जमा केल्याचे सांगितले. रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे व विरोधी आंदोलनास सुरुवात झाली. प्रकल्पाच्या सुरुवातीसच का विरोध झाला नाही? आदी मुद्दे उपस्थित केले. टोलसाठी राज्य शासनाची स्थगिती होती. तसेच यापूर्वीही याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणला. (प्रतिनिधी)