शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

न्यायालयाचा निकाल महापौर निवडीस बंधनकारक

By admin | Updated: June 30, 2015 00:47 IST

स्थगिती नाही : माळवी यांच्या अर्जावर उच्च न्यायालयाचा निकाल

कोल्हापूर : माजी महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशावर सोमवारी (दि. ६) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान, शनिवारी होणाऱ्या नव्या महापौरांच्या निवडीस स्थगिती देण्याची मागणी माळवी यांनी सोमवारी उच्च न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली. महापौर निवडीस स्थगिती न देता याप्रकरणी न्यायालयाचा निकाल नव्या महापौरांवर बंधनकारक असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधीश अभय ओक यांनी दिला. त्यामुळे माळवी यांच्या बाजूने निकाल लागल्यास नवीन महापौरांचा कार्यकाल आपोआपच तत्काळ खंडित होणार आहे. तृप्ती माळवी यांच्यावर स्वीय सहायकामार्फत १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या संशयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी महिन्यात कारवाई केली. मात्र, यानंतरही माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. सभागृहाने ७२ विरुद्ध ० असा, ठराव करीत माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली. यानुसार राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुनावणी घेऊन माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करीत आहे, त्या अनुषंगाने महापौरपदही रद्द केले जात असल्याचा निकाल १७ जूनला दिला. नगरसेवकपद रद्द करीत असल्याचे आदेश मिळताच माळवी यांच्या सर्व सेवा महापालिका प्रशासनाने तत्काळ खंडित केल्या. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात माळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी शनिवारी महापौर निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले. महापौर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नवीन महापौर निवड स्थगित करावी, अशी मागणी तृप्ती माळवी यांनी उच्च न्यायालयाकडे केली. निवडीस स्थगिती न देता न्यायालयाने माळवी प्रकरणी होणारा निवाडा हा नवीन महापौर निवडीस बंधनकारक राहील, असे आदेश दिले. सोमवारी किंवा ज्यावेळी न्यायालयाचा निकाल माळवी यांच्या बाजूने सकारात्मक लागल्यास नवीन महापौरपद तत्काळ रद्दबादल ठरणार आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांची धाकधूक वाढलीकॉँग्रेसतर्फे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पदासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. आता नाही तर कधीच पुन्हा संधी नाही, असे म्हणत सर्वच इच्छुक कामाला लागले आहेत. माळवी यांचा राजीनामा लांबल्याने दहा महिन्यांचे महापौरपद अवघ्या पाच महिन्यांवर आले. आता निवडीचा कार्यक्रम झाल्यानंतर न्यायिक प्रक्रियेत महापौरपद अडकले आहे. न्यायालयाचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत नव्या महापौरांवर टांगती तलवार असणार आहे.