शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:02 IST

गेल्या वर्षभरापासून शिवाजी विद्यापीठातील ६२ कर्मचारी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काम करत आहेत. विद्यापीठात आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर येथे कामकाज सुरू आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचारी जिल्हा प्रशासन घेत असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम६२ कर्मचारी निवडणुकीच्या कामात; रोजंदारी कर्मचाऱ्यांवर भार

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून शिवाजी विद्यापीठातील ६२ कर्मचारी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काम करत आहेत. विद्यापीठात आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर येथे कामकाज सुरू आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचारी जिल्हा प्रशासन घेत असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.विद्यापीठ प्रशासन आणि अधिविभागासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची एकूण ७०४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ४५२ पदे कार्यरत असून २११ पदे रिक्त आहेत. दरमहा कर्मचारी निवृत्त होत असल्याने रिक्तपदांची संख्या वाढत आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडून दिली जात असल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

प्रशासनातील विविध बिले अदा करणे अथवा विद्यार्थ्यांसाठी संबंधित असलेल्या पीएच.डी.सह विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावणे, आदींना विलंब होत आहे. नियमित कर्मचारी निवडणूक विषयक कामांसाठी जात असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांसह उर्वरीत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे.

जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंतीविद्यापीठात सध्या आवश्यकतेपेक्षा मनुष्यबळ कमी आहे. विद्यापीठातील कामकाज सुरळीतपणे चालण्याबाबतचा विचार करून येथील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात यावे, अशी आम्ही जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने आमच्याकडून कर्मचाऱ्यांची माहिती घेतल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर