शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:02 IST

गेल्या वर्षभरापासून शिवाजी विद्यापीठातील ६२ कर्मचारी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काम करत आहेत. विद्यापीठात आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर येथे कामकाज सुरू आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचारी जिल्हा प्रशासन घेत असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम६२ कर्मचारी निवडणुकीच्या कामात; रोजंदारी कर्मचाऱ्यांवर भार

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून शिवाजी विद्यापीठातील ६२ कर्मचारी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काम करत आहेत. विद्यापीठात आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर येथे कामकाज सुरू आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचारी जिल्हा प्रशासन घेत असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.विद्यापीठ प्रशासन आणि अधिविभागासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची एकूण ७०४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ४५२ पदे कार्यरत असून २११ पदे रिक्त आहेत. दरमहा कर्मचारी निवृत्त होत असल्याने रिक्तपदांची संख्या वाढत आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडून दिली जात असल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

प्रशासनातील विविध बिले अदा करणे अथवा विद्यार्थ्यांसाठी संबंधित असलेल्या पीएच.डी.सह विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावणे, आदींना विलंब होत आहे. नियमित कर्मचारी निवडणूक विषयक कामांसाठी जात असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांसह उर्वरीत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे.

जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंतीविद्यापीठात सध्या आवश्यकतेपेक्षा मनुष्यबळ कमी आहे. विद्यापीठातील कामकाज सुरळीतपणे चालण्याबाबतचा विचार करून येथील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात यावे, अशी आम्ही जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने आमच्याकडून कर्मचाऱ्यांची माहिती घेतल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर