शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

३२०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्रीवर बंदी आणा कारखानदारांची केंद्र शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:56 IST

जीवनाश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार उसाची ‘एफआरपी’ ठरविताना धरलेल्या साखरेच्या दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही.

कोल्हापूर : जीवनाश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार उसाची ‘एफआरपी’ ठरविताना धरलेल्या साखरेच्या दरापेक्षा कमी दराने विक्री करता येत नाही. त्यानुसार साखरेची विक्री ३२०० रुपये प्रतिक्विंटलच्या खाली करण्यास बंदी आणा, अशी मागणी राज्यातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

यंदा सुरुवातीच्या महिना-दीड महिन्यात साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले. त्यानंतर साखरेच्या दरातील घसरण थांबत नसल्याने प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे बिले अदा केली. त्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने साखर आयुक्तांनी नोटिसा पाठविल्याने कारखानदार हवालदिल झाले. साखर गोदामामध्ये पडून आहे. बाजारात दर नाही आणि शेतकºयांना पैसे देणे बंधनकारक आहे, अशा पेचात कारखाने अडकले आहे.

राज्य सरकारने ३२ रुपये दराने दहा लाख क्विंटल साखर खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते, ते हवेत विरल्याने संकट गडद होत आहे. केंद्राने प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली; पण त्यासाठी जानेवारी व फेब्रुवारीमधील साखरसाठ्याची अट घातली. त्याचा फायदा फारशा कारखान्यांना झालेला दिसत नाही.

संकटातून बाहेर पडण्यासाठी कारखानादारांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जीवनाश्यक वस्तू कायद्यानुसार एफआरपी ठरविताना जो साखरेचा दर गृहित धरला जातो, तो कायम राखणे बंधनकारक आहे. गत हंगामातील एफआरपी ठरविताना प्रतिक्विंटल ३२०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. गेले सात-आठ महिन्यांत त्यामध्ये ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ३२०० रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्री करण्यास बंदी घालावी, अशी मागणी साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडे केली आहे.सरकारला धास्ती?साखर ३२०० रुपयांच्या खाली विक्री करायची नाही, असा निर्णय केंद्राने घेतला तर तो ग्राहकांच्या पचनी पडणार नाही. याची धास्ती सरकारला असल्याने हा निर्णय होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे चर्चा आहे. 

साखर दरातील घसरणीचे मोठे संकट उभे आहे, त्यासाठी जीवनाश्यक वस्तू कायद्यातील या तरतुदीनुसार केंद्राने निर्णय घेणे अपेक्षित आहे.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ, साखर उद्योग