शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वादग्रस्त आरक्षित जागेवर बांधकामास मज्जाव

By admin | Updated: November 7, 2014 00:09 IST

जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा आदेश : हुपरीत ग्रामपंचायत-धरणग्रस्त आमने-सामने

हुपरी : येथील गट नंबर ९२५/४ ‘अ’ मधील काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीतील विकासकामांसाठी आरक्षित असणाऱ्या जागेवरती ‘जलकुंभ’ उभारण्यास धरणग्रस्तांनी विरोध करून या जागेवर केवळ आपलाच हक्क असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व धरणग्रस्त आमने-सामने आल्याने वादाला चांगलेच तोंड फुटले आहे. या वादग्रस्त मुद्द्याप्रश्नी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करीत नागरी विकासकामासाठी आरक्षित असणारी जागा सरकारी मालकीची असून, केवळ सात-बारा पाहून निर्णय घेता येणार नाही, आवश्यक ती सर्व कागदपत्रे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे ग्रामपंचायत व धरणग्रस्तांना सांगून वेळ मारून नेली आहे. दरम्यान, ‘जलकुंभ’ उभारणीचे काम थांबविण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रौप्यनगरी हुपरी शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी शासनाच्या भारत निर्माण योजनेतून सुमारे १५ कोटी रुपये खर्चाची नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकणे, यशवंतनगर, केंद्रीय प्राथमिक शाळा, शाहूनगर व काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीमध्ये जलकुंभ उभारणे अशा प्रस्तावित कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गट नंबर ९२५/४ ‘अ’ मधील काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीमधील विकासकामांसाठी आरक्षित असणाऱ्या जागेत ‘जलकुंभ’ उभारण्याच्या कामास ग्रामपंचायतीने सुरुवात करण्यास तेथील धरणग्रस्तांनी जोरदार विरोध करून काम बंद पाडले आहे. तसेच याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ग्रामपंचायतीनेही याप्रश्नी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. याबाबत पुनर्वसन अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. (वार्ताहर)कागदपत्रे पाहून निर्णय घेणारदोघांनाही समज देताना पुनर्वसन अधिकारी सूर्यवंशी म्हणाले, सध्या वादग्रस्त बनलेली जागा सरकारी मालकीची असून, मालकी सांगण्यासाठी केवळ सात-बारा पाहून निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी सर्व कागदपत्रे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत या जागेवर धरणग्रस्तांनी किंवा ग्रामपंचायतीने कोणतेही काम सुरू करू नये. ग्रामपंचायतीने जागा मागणीबाबत रीतसर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे योग्य कागदपत्रांच्या प्रस्तावासह पाठवावा, अशा सूचना केल्या आहेत.