शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी पद्धत पुन्हा सुरू करा ;कंत्राटी वीज कामगारांची मागणी

By admin | Updated: May 22, 2017 17:42 IST

कोल्हापूर जिल्ह्यात ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २२ : रानडे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी. कंत्राटी पद्धत बंद करावी. रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी, आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांनी सोमवारपासून ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू केले. त्यात महावितरण आणि महापारेषण कंपनीतील सुमारे पाचशे कर्मचारी सहभागी झाले.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाबाबत संघाचे जिल्हा सचिव अमर लोहार यांनी सांगितले की, संघाच्या तिसऱ्या अधिवेशनात कंत्राटी कामगार कायम होईपर्यंत पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी याबाबतचा ठराव झाला होता. यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन प्रधान ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वीज उद्योगातील काही प्रमुख संघटना प्रतिनिधींची समिती स्थापन केली.

‘महानिर्मिती’चे कार्यकारी संचालक मनोज रानडे यांनी याबाबतचा सकारात्मक अहवाल ऊर्जा खात्याकडे दिला आहे. रानडे समितीतील सर्व सदस्यांचे रोजंदारी कामगार पद्धतीवर एकमत झाले आहे. मात्र, आता शासन हे आर्थिक बोजाचे कारण देत याबाबत टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संघाने राज्यभर ‘बेमुदत काम बंद ’आंदोलन सोमवारी सुरू केले. त्यात सहभागी होत कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी ताराबाई पार्क येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणाबाजी केली.

आंदोलनात संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, कोषाध्यक्ष मधुकर माळी, संघटकमंत्री अनिल लांडगे, शकील महात, अरुण गावडे, योगेश आयरे, के. पी. तांबेकर आदी सहभागी आहेत

. ...अन्यथा तीव्र आंदोलन करणार

या आंदोलनाची माहिती वीज उद्योगातील कंपनींना एक महिन्यांपूर्वी दिली आहे. त्यानंतर आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ८ मे रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन संघाने केले असल्याचे जिल्हा सचिव लोहार यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या मागण्यांबाबत तीन दिवसांत सकारात्मक निर्णय वीज कंपन्या आणि राज्य सरकारने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यात आमरण उपोषण, साखळी उपोषण आदींचा समावेश असेल. जिल्ह्यात रोज ४५० कंत्राटी कामगार हे विद्युत वाहिनीची दुरुस्ती, बिल वितरण-वसुली, लेखनिक आदी स्वरुपातील कामे करतात. ‘बेमुदत काम बंद आंदोलन’ सुरू केल्याने सोमवारी संबंधित कामे ठप्प झाली.