शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार रस्त्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांची

By admin | Updated: November 13, 2014 00:01 IST

नेत्रदीप सरनोबत : कामांत हलगर्जीपणा केल्यास ‘गय’ नाही, अडथळा आणल्यास फौजदारी

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आता १५०हून अधिक रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी हाती घेतली आहे. नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांची बांधणी दर्जेदार करण्याची जबाबदारी ठेकेदारांचीच असेल; मात्र या रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील सर्व अधिकाऱ्यांची आहे. रस्ते कामांत हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद आज, बुधवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महापालिकेतील अभियंत्यांच्या बैठकीत दिली.नगरोत्थान योजनेतील ३९ किलोमीटरचे रस्ते व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम वेळेत व दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने यापूर्वीच घेतला आहे. मुदतीत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर पाच ते दहा हजार रुपये दरदिवशी दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. सर्व्हे, गळती काढणे, टेस्ट रिपोर्ट, आदी तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे.शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीची तरतूद करूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. तसेच इतर लहान-मोठे १५०हून अधिक रस्ते करण्यात येणार आहेत. कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवकांवर थेट फौजदारी दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आता वेळेत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे दिव्य प्रशासनाला करावे लागणार आहे. नागरिकांच्या तगाद्यामुळे प्रशासनानेही दर्जेदार रस्त्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनानेही रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सर्व कनिष्ठ व उपअभियंत्यांना रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवून दर दोन दिवसांनी अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. इतके करूनही रस्ता खराब झाल्यास किंवा नागरिकांची तक्रार आल्यास खराब रस्त्यांसाठी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे. - नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)