शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारचीच असली तरी राज्य सरकार जबाबदारी टाळू शकत नाही. राज्य ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारचीच असली तरी राज्य सरकार जबाबदारी टाळू शकत नाही. राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारित बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व मागण्याही तत्काळ मान्य केल्या पाहिजेत, अशी आग्रही भूमिका सोमवारी शाहू छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमवारी येथे मांडली.

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने स्थापन केलेल्या सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या संस्था सक्षम करण्याची व त्यांना स्वायत्तता देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून ती पार पाडावी, अशी अपेक्षाही शाहू छत्रपतींनी या वेळी व्यक्ती केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोल्हापुरात आले होते. शासकीय बैठका सुरू होण्यापूर्वीच सकाळी नऊ वाजता पवार थेट न्यू पॅलेसवर गेले. त्यांनी शाहू छत्रपतींची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजे, उद्योगपती व्ही. बी. पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंत मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत उपस्थित होते.

पवार यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले असले तरी खासदार संभाजीराजे यांचे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शाहू छत्रपती यांची भूमिका जाणून घेण्यासाठीच पवार न्यू पॅलेसवर गेले होते. दोघांमध्ये सुमारे तासभर मराठा आरक्षणातील प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा झाली.

शाहू छत्रपती म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा नीट अभ्यास करून न्यायालयीन पातळीवर रिटपिटीशन याचिका; तसेच क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येईल का? या अनुषंगाने राज्य सरकारने अभ्यास करावा. ही वेळखाऊ बाब असली तरी पुढे काय करता येईल, याची कायदेतज्ज्ञांकडून माहिती घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य भूमिका केंद्र सरकारचीच आहे. आरक्षणाची मर्यादा संपली असल्याने कोणाचेही आरक्षण काढून न घेता घटना दुरुस्ती करून आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेतेमंडळींनी केंद्र सरकारकडे गेले पाहिजे, प्रसंगी त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. राज्य सरकार म्हणून तुम्ही यात पुढाकार घ्यावा.

प्रश्न मार्गी लावा..

केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही. मराठा समाजाने ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्या राज्य सरकारशीही निगडित आहेत. त्यावरदेखील राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या संस्थांना सक्षम करून त्यांना स्वायत्तता द्यावी, असे शाहू छत्रपतींनी सांगितले.

-राज्य सरकार सकारात्मक - शाहू छत्रपती

मराठा समाजाच्या आरक्षणावर आमची चर्चा झाली. राज्य सरकार या प्रश्नावर सकारात्मक असल्याचे अजित पवार यांच्याशी चर्चा करताना जाणवले. मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार निर्णय घेईल असे दिसते. राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दावा पवार यांनी चर्चेदरम्यान केला. त्यामुळे राज्य पातळीवर सर्व काही व्यवस्थित होईल. केंद्र सरकारला या विषयात रस असेल तर त्यांनी घटना दुरुस्ती करून आरक्षण दिले पाहिजे, असे शाहू छत्रपती यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सावंत, मुळीक यांच्याशी चर्चा-

शाहू छत्रपती व अजित पवार यांच्यातील चर्चा संपल्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांच्याशीही पवार यांनी चर्चा केली. मराठा समाजाच्या सतरा मागण्यांपैकी प्रमुख चार-पाच मागण्यांवर या वेळी चर्चा झाली. पवार यांनी दाेघांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. या वेळी माणिक मंडलिकदेखील उपस्थित होते.

(फोटो पाठवत आहे)