शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

महादेवभाई नाटकाच्या अभिवाचनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:04 IST

कोल्हापूर : महात्मा गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या घटनांबाबत तसेच त्यांच्या विचारांवर वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणाºया आणि महादेवभाई देसाई या महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या जीवनावर आधारित महादेवभाई या नाटकाचे अभिवाचन प्रत्यय या नाट्यसंस्थेमार्फत करण्यात आले.

कोल्हापूर : महात्मा गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या घटनांबाबत तसेच त्यांच्या विचारांवर वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणाºया आणि महादेवभाई देसाई या महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या जीवनावर आधारित महादेवभाई या नाटकाचे अभिवाचन प्रत्यय या नाट्यसंस्थेमार्फत करण्यात आले.लक्ष्मीपूरीतील श्रमिक सभागृहात झालेल्या या अभिवाचनाला मोजक्याच परंतु दर्दी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहर शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रत्यय या कोल्हापुरातील नाट्यसंस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे अभिवाचन समीर पंडितराव, दिलीप बापट, मिलिंद इनामदार, कृष्णा भूतकर, अभय मणचेकर, रोहित पोतनीस, डॉ. सुहास लकडे, पवन खेबूडकर या रंगकर्मींनी आपल्या ओघवत्या संवादफेकीने केले.

रामू रामनाथन या मूळ लेखकाने हे नाटक लिहिले आहे. त्याचा अनुवाद कोल्हापूरातीलच अनुवादक माया पंडित यांनी केला आहे, तर प्रत्ययचे रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांनी संकलन केले आहे. या अभिवाचनाला सिद्धी मिरजे आणि मंगेश कांबळे यांनी अतिशय प्रभावी असे पार्श्वसंगीत दिले होते. साहील कल्लोळी आणि स्वरुपा फडके यांनी संयोजन सहाय्य केले. एका वेगळ्या कलाकृतीचा अनुभव या अभिवाचनामुळे मिळाला.

या वेळी जेष्ठ रंगकर्मी डॉ.शरद भुताडीया यांना पुण्याच्या अत्रे प्रतिष्ठानकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, प्रा.टी. एस.पाटील यांच्या हस्ते आणि पुरोगामी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीची आजपर्यतची वाटचाल यावर कपील मुळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मार्गदर्शन केले. जेष्ठ नाट्यकर्मी आणि कोल्हापूर शाखेचे सांस्कृतीक कार्यवाह सुनील माने यांनी कोल्हापूरातील नाट्यसंस्थांची समन्वयी आणि पुरोगामी वाटचाल या विषयी माहिती सांगितली. यावेळी त्यांनी अं.नि.स.च्या कामात सर्व नाट्यसंस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

या वेळी रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाच्या सदस्य संजिवनी तडेगावकर, प्राचार्य टी.एस.पाटील, व्यंकप्पा भोसले, शरद नावरे, अनमोल कोठाडीया, अतुल दिघे, तनुजा शिपूरकर, संजय हळदीकर, निहाल शिपुरकर आदी मान्यवर आणि पुरोगामी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन संघसेन जगतकर यांनी केले तर आभार सीमा पाटील यांनी मानले.