शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विरोधी उमेदवारांबद्दल आदर, पक्षनिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:51 IST

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ...

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ते आणि यशवंतराव चव्हाण एकाच बरॅकमध्ये होते. माझ्या घरी कायमच यशवंतरावांसह अनेक मोठ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह होते बैलगाडी. पुढे हात चिन्ह आले.मी जो काळ पाहत मोठी झाले, वाढले त्या काळात उमेदवार एकमेकांचा आदरपूर्वक उच्चार करायचे. पक्ष असो वा व्यक्ती दोन्ही पातळींवर एका मर्यादेचे पालन केले जायचे. समजुतीने निर्णय घेतले जायचे. आपण संसदेत जाण्याकरीता ज्या पदासाठी निवडणूक लढवत आहोत त्या पदाचा सन्मान आणि आदर राखून प्रचारात भाषा वापरली जायची. निवडणुका आल्या की शहरात वेगळेच वातावरण असायचे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कºहाडमधून लढायचे, तेव्हा आजच्यासारखी हायटेक प्रचारयंत्रणा नव्हती. त्यामुळे कितीही मोठा नेता असला तरी घरोघरी जाऊन, प्रत्येक मतदाराला भेटून आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन करायचे. कोणताही डामडौल नाही की अफाट खर्च नाही. मी पहिल्यांदा मतदान केले १९६९-७०च्या दरम्यान तेही कोल्हापुरात. त्यावेळी आपल्या मताला, विचारांना काही महत्त्व आहे या जबाबदारीची जाणीव झाली. त्यावेळी नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा असायची. त्यांच्या ‘शब्दा’वर जनतेचा विश्वास बसायचा आणि नेतेही दिलेले आश्वासन पूर्ण करायचे. प्रश्न सोडवायचे. आता ती विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे कोणताही उमेदवार निवडून आला तरी सर्वसामान्यांच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही असे एक निराशाजनक चित्र आहे.गेल्या काही वर्षांत निवडणुकीतील प्रचाराने खालचे टोक गाठले आहे. जिंकणे हे उद्दिष्ट असले तरी त्यात आजच्यासारखी एकमेकांवर जहरी आणि हीन टीकाकेली जात नसे किंवा दुसऱ्याला ठरवून खाली खेचण्यासाठीची स्पर्धा नव्हती. आता निवडणुकीच्या काळात आणि इतरवेळीही जे काही घडतंय ते आमच्यासारख्यांच्या बुद्धीपलीकडचे आहे. आपलानेमका अजेंडा काय, आपले विचार काय, आपण काय करतोय आणि नेमकं काय साधायचंय याबद्दल कार्यकर्तेच काय नेत्यांचीही दृष्टी धूसर झाली आहे, असे दुर्दैवाने वाटते.-डॉ. वासंती टेंबे, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका