शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

विरोधी उमेदवारांबद्दल आदर, पक्षनिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:51 IST

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ...

मी मूळची कºहाडची. माझे वडील वासुदेव किरपेकर हे स्वातंत्र्यसेनानी. सक्रिय चळवळीमुळे त्यांना सहा वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा जेलमध्ये ते आणि यशवंतराव चव्हाण एकाच बरॅकमध्ये होते. माझ्या घरी कायमच यशवंतरावांसह अनेक मोठ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राबता असायचा. त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह होते बैलगाडी. पुढे हात चिन्ह आले.मी जो काळ पाहत मोठी झाले, वाढले त्या काळात उमेदवार एकमेकांचा आदरपूर्वक उच्चार करायचे. पक्ष असो वा व्यक्ती दोन्ही पातळींवर एका मर्यादेचे पालन केले जायचे. समजुतीने निर्णय घेतले जायचे. आपण संसदेत जाण्याकरीता ज्या पदासाठी निवडणूक लढवत आहोत त्या पदाचा सन्मान आणि आदर राखून प्रचारात भाषा वापरली जायची. निवडणुका आल्या की शहरात वेगळेच वातावरण असायचे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कºहाडमधून लढायचे, तेव्हा आजच्यासारखी हायटेक प्रचारयंत्रणा नव्हती. त्यामुळे कितीही मोठा नेता असला तरी घरोघरी जाऊन, प्रत्येक मतदाराला भेटून आपल्याला मतदान करण्यासाठी आवाहन करायचे. कोणताही डामडौल नाही की अफाट खर्च नाही. मी पहिल्यांदा मतदान केले १९६९-७०च्या दरम्यान तेही कोल्हापुरात. त्यावेळी आपल्या मताला, विचारांना काही महत्त्व आहे या जबाबदारीची जाणीव झाली. त्यावेळी नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा असायची. त्यांच्या ‘शब्दा’वर जनतेचा विश्वास बसायचा आणि नेतेही दिलेले आश्वासन पूर्ण करायचे. प्रश्न सोडवायचे. आता ती विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे कोणताही उमेदवार निवडून आला तरी सर्वसामान्यांच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही असे एक निराशाजनक चित्र आहे.गेल्या काही वर्षांत निवडणुकीतील प्रचाराने खालचे टोक गाठले आहे. जिंकणे हे उद्दिष्ट असले तरी त्यात आजच्यासारखी एकमेकांवर जहरी आणि हीन टीकाकेली जात नसे किंवा दुसऱ्याला ठरवून खाली खेचण्यासाठीची स्पर्धा नव्हती. आता निवडणुकीच्या काळात आणि इतरवेळीही जे काही घडतंय ते आमच्यासारख्यांच्या बुद्धीपलीकडचे आहे. आपलानेमका अजेंडा काय, आपले विचार काय, आपण काय करतोय आणि नेमकं काय साधायचंय याबद्दल कार्यकर्तेच काय नेत्यांचीही दृष्टी धूसर झाली आहे, असे दुर्दैवाने वाटते.-डॉ. वासंती टेंबे, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका