शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘ज्ञानगंगा घरोघरी’चा संकल्प अपूर्णच

By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST

माणिकराव साळुंखे यांची खंत : ज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

सांगली : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असून, ते पूर्ण करण्यास आम्ही कमी पडलो आहोत. भविष्यात सामान्यांच्या घरात शिक्षणाची ज्ञानगंगा नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.डॉ. साळुंखे म्हणाले, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी लोकविद्यापीठाची संकल्पना मांडली होती. त्यांचेच कार्य मुक्त विद्यापीठ पुढे नेत आहे. सध्या महाराष्ट्रातील सात लाख विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. येथे शिकणारे सर्वजण नोकरी-व्यवसाय सांभाळून शिक्षण घेतात. मागील वर्षी २८० विद्यार्थ्यांनी बी. एस्सी. ची पदवी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत नोकऱ्या लागल्या आहेत. कौशल्य विकासाला भविष्यकाळात अत्यंत महत्त्व येणार आहे. साहजिकच विद्यापीठाच्या माध्यमातून ‘स्किल डेव्हलपमेंट’ या विषयाकडे लक्ष देण्यात येणार आहे. आजकाल इतर विद्यापीठातून जे शिक्षण मिळते त्यामुळे केवळ पदव्या प्राप्त होतात. परंतु त्यातील बहुतांश ज्ञानाचा जीवनात वावरताना काहीही उपयोग होत नाही. शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्यातील असले पाहिजे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करुन दिली आहेत. त्याचा लाभ आज असंख्य विद्यार्थी घेत आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे मुक्त विद्यापीठाला नेमलेल्या पुस्तकांचा अभ्यास करीत आहेत. (प्रतिनिधी)भविष्यात मोबाईलवरुन शिक्षण देणारप्रत्येकाकडे मोबाईल हमखास असतो. त्यामुळे भविष्यात मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा नवीन प्रयोग करण्याचा मुक्त विद्यापीठाचा विचार आहे. पुढील वर्षापासून विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात संबंधित विषयांची पुस्तके घरपोच करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन तीन अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात येणार असल्याचेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.शिवाजी विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी काम करतानाचा अनुभव भिन्न आहे. मुक्त विद्यापीठात नवनवीन उपक्रम राबविण्यास मोकळीक आहे, मात्र ते स्वातंत्र्य इतर विद्यापीठात नसल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.