शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

विभागात २३ लाख वृक्षलागवडीचा संकल्प

By admin | Updated: June 28, 2016 01:15 IST

शुक्रवारी लोकचळवळ : ४३९८ गावांतील १० लाख लोक सहभागी होणार, एम. के. राव यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर वनविभागात शुक्रवारी (दि. १) २३ लाख २५ हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प वनविभागाने केल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एम. के. राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या लोकचळवळीत ४३९८ गावांतील सुमारे १० लाख लोक सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वनक्षेत्र व वृक्षाच्छादन २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने वन विभागाने ‘हरित महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी १ ते ७ जुलै या कालावधीत वनमहोत्सवाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्णांसाठी ११ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले असले तरी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्थांच्या पाठबळावर २३ लाखांपर्यंत वृक्षलागवड करण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारपासून ११ हजार २५२ ठिकाणी वनविभाग, सामाजिक वनीकरण व इतर संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व लोकप्रतिनिधींच्या हस्ते लागवड केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठात सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘सुतार विहीर’ परिसरात हरित महाराष्ट्र कार्यक्रमास कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. पाचही जिल्ह्णांत हा कार्यक्रम राबविला जाणार असून यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एम. के. राव यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, दादा शेंडगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हजार झाडांमागे एक कुटुंब केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी एक हजार झाडांमागे एक कुटुंबाची नेमणूक केली जाणार असून पाच वर्षांचा करार केला जाणार आहे. यासाठी संबंधित कुटुंबाला सरकार पैसे देणार आहे. त्याचबरोबर शाळांत ‘वृक्ष दत्तक’ योजना राबविणार असल्याचे राव यांनी सागिंतले. ‘बिग बी’ची भेट वृक्षारोपण करताना नागरिकांनी ‘सेल्फी विथ ट्री’ या स्पर्धेमध्ये आपले फोटोग्राफ्स पाठवावेत. १ जुलै रोजी सकाळी ६ ते ३ जुलैच्या रात्री बारापर्यंत फोटो पाठवावेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेते काढले जाणार असून विजेत्यांना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्याशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मेळघाट, ताडोबा येथील अभयारण्यांना मोफत भेटी देता येणार आहेत.