शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

आलाबादमध्ये भूसंपादनास विरोध

By admin | Updated: January 21, 2015 23:57 IST

शेतकऱ्यांत चकमक : झुलपेवाडीचे पाणी अडवणार : प्रकल्पग्रस्त

सेनापती कापशी : बारवे-दिंडेवाडी प्रकल्पानुसार जमिनीचा कब्जा घेण्यासाठी आलाबाद (ता. कागल) येथे आले असता प्रकल्पग्रस्त व लाभधारक यांच्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासमोरच शाब्दिक चकमक झाली. यातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला.२००० सालापासून दिंडेवाडी-बारवे प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेव्हापासून जमिनी शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. आज, बुधवारी आलाबाद (ता. कागल) येथे प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा कब्जा देण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी आले असता आलाबाद येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. यातील काही शेतकरी भूसंपादनाच्या विरोधात हायकोर्टात गेले असल्यामुळे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत थांबावे लागणार आहे. दरम्यान, सूर्यवंशी गटनंबरप्रमाणे सुनावणी करत असताना अचानक प्रकल्पग्रस्त व लाभधारक यांच्यात सकाळपासून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचे हाणामारीत रूपांतर झाले.आम्ही जमिनी दिल्या म्हणून प्रकल्प होत आहे, असे असताना आम्हालाच जर मारहाण होणार असेल, तर दिंडेवाडी-बारवे प्रकल्पच रद्द करा व आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, अन्यथा येत्या काही दिवसांत चिकोत्रा प्रकल्पातील पाणी अडविण्याचा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला. दरम्यान, आलाबाद (ता. कागल) येथील शेतकऱ्यांनीही बेकायदा जमीन संपादन थांबविण्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना जमिनी या द्याव्या लागतील. आलाबाद (ता. कागल) येथील बरेच शेतकरी कोर्टात गेले आहेत. त्यामुळे कोर्टाचा निकाल लागेपर्यंत व स्टेआॅर्डर असल्यामुळे निकालानंतर पुन्हा ही प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत जे शेतकरी स्वखुशीने कब्जा देण्यास तयार आहेत. त्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.