शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

आरक्षणासंबंधी करणार साळवेंशी चर्चा: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:36 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री व राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री व राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह १२ जण विशेष विमानाने शुक्रवारी (दि. ७) दिल्लीला जाणार असून तेथे प्रख्यात विधीज्ञ हरिष साळवे व कुंभकोणी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. स्वत: पाटील यांनीच ‘लोकमत’ भेटीवेळी सोमवारी सायंकाळी ही माहिती दिली. राज्य शासनाने आरक्षण देण्यासाठी जेवढी मेहनत घेतली, त्याहून जास्त मेहनत आम्ही आरक्षण टिकवण्यासाठी घेत असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.आरक्षण आंदोलनामध्ये ‘लोकमत’ ने बजावलेल्या भूमिकेबध्दल सरकारच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंत्री पाटील यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयास भेट दिली. आरक्षण मिळवून देण्यात मोठा वाटा उचलल्याबध्दल ‘लोकमत’च्यावतीने संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी आरक्षण देण्यासाठी सरकारने काय-काय केले याचा उलगडा केला.मंत्री पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षण लागू करताना कोणत्याही कायदेशीर त्रुटी राहू नयेत यासाठी विख्यात विधिज्ञ साळवे यांची आम्ही सुरुवातीपासूनच मदत घेतली. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष कायदा करण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा अ‍ॅड साळवे हे कौटुंबिक कामानिमित्ताने लंडनला गेले होते. सरकारकडून कायद्याचा मसुदा घेवून तीनवेळा वरिष्ठ अधिकारी लंडनमध्ये पाठविण्यात आला. त्यांनी दुरुस्त्या केल्यानंतरच कायद्याला अंतिम स्वरुप देण्यात आले.मंत्री पाटील म्हणाले, ‘आम्हांला या कायद्यामध्ये कोणत्याही त्रुटी नको होत्या, त्यांनी इतर मागास आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि उर्वरित ३२ टक्क्यांमध्येही मराठा तरुणांना नोकरीची संधी मिळेल हे दोन उल्लेख त्यांनी या मसुद्यामध्ये स्वतंत्रपणे करण्यास सांगितले. त्यामुळे इतर मागासवर्गीयांच्या मनांतही साशंकता निर्माण होणार नाही आणि मराठा समाजातही त्यावरून कांही बुध्दीभेदाचे राजकारण होणार नाही याची दक्षता सरकारने घेतली. राज्य मागासवर्ग आयोगानेही खूप मेहनत घेतली. गेले तीन महिने या आयोगाचे सदस्य घरी न जाता केवळ याच कामामध्ये व्यस्त राहिले. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधिश एम. जी. गायकवाड यांच्या पापणीला अतिताणामुळे दुखापत झाली. रोज रात्री काम संपल्यावर त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जात होते. परंतू अशा स्थितीतही त्यांनी हे काम केले. कोल्हापूरचे माजी न्यायाधीश के. डी. पाटील यांचेही यामध्ये मोठे योगदान आहे.’संपादक वसंत भोसले म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय अतिशय संयमाने व कुशलतेने हाताळला त्यामुळे समाजात कटूता निर्माण झाली नाही. ‘लोकमत’ने सुरुवातीपासूनच दोन समाजात कसे सौहार्द राहिल असाच प्रयत्न केला. आरक्षणाचा निर्णय म्हणजे राज्याचाही कसोटीचा क्षण होता परंतू सरकार त्यास यशस्वीपणे सामोरे गेले.’ यावेळी ‘लोकमत’चे सर्व विभागप्रमुख, बातमीदार व अन्य सहकारी उपस्थित होते.गनिमी काव्याने मराठा आरक्षणचा निर्णयकोल्हापूर : मराठा आरक्षण निर्णय होण्याआधीच तो हाणून पाडण्यासाठी काहीजण काळे कोट घालून सज्ज होते; त्यामुळे ‘गनिमी काव्या’नेच आरक्षणाचा निर्णय घेतला. तसेच या आरक्षणाविरोधात कोणी न्यायालयात गेले तरी ते टिकण्यासाठी सरकारच्या वतीने भक्कमपणे बाजू मांडली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे दिली.