शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संघर्षाशिवाय आरक्षण अशक्य: संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:37 IST

मुरगूड : गेल्या चार वर्षांपासून आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज विविध स्तरावर आंदोलन करीत आहे. मूक मोर्चा, ठोक मोर्चा आणि आता ठिय्या आंदोलन, पण अद्यापही सरकारला जाग आलेली नाही. त्यांचा हेतू स्पष्ट नाही. त्यामुळे आयुष्यभर संघर्ष पाचवीला पूजलेल्या मराठा समाजाला संघर्ष केल्याशिवाय आरक्षण मिळणार नसल्याने आपण आरक्षणासाठी ...

मुरगूड : गेल्या चार वर्षांपासून आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज विविध स्तरावर आंदोलन करीत आहे. मूक मोर्चा, ठोक मोर्चा आणि आता ठिय्या आंदोलन, पण अद्यापही सरकारला जाग आलेली नाही. त्यांचा हेतू स्पष्ट नाही. त्यामुळे आयुष्यभर संघर्ष पाचवीला पूजलेल्या मराठा समाजाला संघर्ष केल्याशिवाय आरक्षण मिळणार नसल्याने आपण आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या मागे ठाम आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले.मुरगूड (ता. कागल) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरूअसणाºया ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रा. मंडलिक आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते उपस्थित तरुणांना गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. संतोष भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जैन समाज, खाटीक समाज, कागल वकील बार असोसिएशन, व्यापारी संघटना, दलित महासंघ, पत्रकार संघ, आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.यावेळी प्रा. संजय मंडलिक म्हणाले, मराठा समाजाची मागणी रास्त आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रभातफेरीत सुमारे पाचशे पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, दलितमित्र डी. डी. चौगले, शिवाजीराव चौगले, जीवन शिंदे, धनाजी गोधडे, सुधीर सावर्डेकर, रणजित सूर्यवंशी, पांडुरंग भाट, सुनील मंडलिक, दीपक शिंदे, भगवान लोकरे, दत्तात्रय मंडलिक, रवी परीट, नीलेश शिंदे, बी. एम. पाटील, अमिततोरसे, सर्जेराव पाटील उपस्थित होते. संजय भारमल यांनी आभार मानले.पालकमंत्र्यांचाजाहीर निषेधयावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना सुमारे दोन तास ताटकळत ठेवत संभाजी भिडे यांना भेट दिली. ज्या भिडेंवर आरोप होत आहेत त्यांची महत्त्वाच्या विषयावरील चर्चा सोडून भेट घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करीत चंद्रकांत पाटील यांचा आपण जाहीर निषेध करीत असल्याचे सांगितले.