शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

आरक्षण एकट्या भाजपचे यश नव्हे : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:02 IST

आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव ...

आंबोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ४० समाजबांधवांनी हौतात्म्य पत्करले, ५८ मोर्चे काढले, विरोधी पक्षांनी सरकारवर सातत्याने दबाव टाकल्यावर मग सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. असे असताना भाजपने त्याचे श्रेय घ्यायला हे काही एकट्या भाजपचे यश नव्हे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जाहिराती व डिजिटल फलकांची हवा १५ दिवस राहील. त्यामुळे तिचा आगामी लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या सभेसाठी आलेल्या पाटील यांनी सभा झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ज्यांनी मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ अशी हेटाळणी केली, तेच आता आरक्षण दिल्यावर त्याच्या श्रेयासाठी धडपडत आहेत.आमचे सरकार असतानाही हा निर्णय झाला होता; परंतु त्यावेळी आम्ही कुठेही अशी जाहिरातबाजी केली नव्हती; कारण ते समाजाचे काम आहे, अशी आमची भावना होती. मराठा, धनगर, मुस्लिम समाजांचे कोणतेही प्रश्न या सरकारने गेल्या चार वर्षांत सोडविलेले नाहीत.त्यामुळे हे समाजघटक नाराज असल्याने राज्यात भविष्यात सत्ता येणार नाही, अशी धास्ती वाटल्यानेच भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला.दु:ख, पण इलाज नाहीमाजी खासदार निवेदिता माने यांनी पक्ष सोडल्याबद्दल त्यांना विचारले असता पाटील यांनी दु:ख आहे; पण इलाजही नाही, अशी प्रतिक्रिया दिली.राणे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा नाहीसिंधुदुर्गची लोकसभेची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसच तेथील उमेदवाराबाबत निर्णय घेऊ शकेल. परंतु या जागेवरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दोन्ही काँग्रेसनी पाठिंबा द्यायचा, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.