शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या वेळी खासदार संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील मांडीला मांडी लावून आंदोलनात सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात याचीच उत्सुकता जास्त होती, पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.

आंबेडकर म्हणाले, आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला कायमच पाठिंबा आहे. त्यांना आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे, पण कायदेशीरदृष्ट्या टिकणारे, सवलती मिळवून देणारे आरक्षण देणे सद्य:स्थितीत अवघड आहे. कारण केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून आरक्षणाच्या बाबतीतील राज्य सरकारांचे अधिकारच काढून घेतले आहेत. राज्याला आता कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तसे द्यायचे असल्यास घटना दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मराठ्यांना कायद्याच्या चाैकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी, यासाठी येथून पुढे पाठपुरावा करावा लागणार आहे.

चौकट

महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण

कोल्हापुरातून मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग फुंकताना आंबेडकर व संभाजीराजे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, आमदार, खासदार, मंत्री सहभागी झाले होते. आंदोलन मराठ्यांचे असलेतरी त्याला उपस्थितांची मांदियाळी पाहिल्यावर महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण लावण्याची मुहूर्तमेढच रोवली गेल्याचे दिसत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर यांनी मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपची ‘बी टीम’ म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली. वंचितमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे बरेचसे उमेदवारी कमी मतांनी पराभूत झाल्याने आंबेडकर यांच्यावर राग कायम आहे, पण राजकारणात कोणी कायमचा शत्रू वा मित्र नसतो, याच उक्तीप्रमाणे आता बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. दोन्ही कॉंग्रेस व आंबेडकर यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी म्हणून पुन्हा एकदा या सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचे बोलले जात आहे.