शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या वेळी खासदार संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील मांडीला मांडी लावून आंदोलनात सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात याचीच उत्सुकता जास्त होती, पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.

आंबेडकर म्हणाले, आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला कायमच पाठिंबा आहे. त्यांना आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे, पण कायदेशीरदृष्ट्या टिकणारे, सवलती मिळवून देणारे आरक्षण देणे सद्य:स्थितीत अवघड आहे. कारण केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून आरक्षणाच्या बाबतीतील राज्य सरकारांचे अधिकारच काढून घेतले आहेत. राज्याला आता कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तसे द्यायचे असल्यास घटना दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मराठ्यांना कायद्याच्या चाैकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी, यासाठी येथून पुढे पाठपुरावा करावा लागणार आहे.

चौकट

महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण

कोल्हापुरातून मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग फुंकताना आंबेडकर व संभाजीराजे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, आमदार, खासदार, मंत्री सहभागी झाले होते. आंदोलन मराठ्यांचे असलेतरी त्याला उपस्थितांची मांदियाळी पाहिल्यावर महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण लावण्याची मुहूर्तमेढच रोवली गेल्याचे दिसत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर यांनी मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपची ‘बी टीम’ म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली. वंचितमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे बरेचसे उमेदवारी कमी मतांनी पराभूत झाल्याने आंबेडकर यांच्यावर राग कायम आहे, पण राजकारणात कोणी कायमचा शत्रू वा मित्र नसतो, याच उक्तीप्रमाणे आता बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. दोन्ही कॉंग्रेस व आंबेडकर यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी म्हणून पुन्हा एकदा या सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचे बोलले जात आहे.