शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या वेळी खासदार संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील मांडीला मांडी लावून आंदोलनात सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात याचीच उत्सुकता जास्त होती, पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.

आंबेडकर म्हणाले, आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला कायमच पाठिंबा आहे. त्यांना आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे, पण कायदेशीरदृष्ट्या टिकणारे, सवलती मिळवून देणारे आरक्षण देणे सद्य:स्थितीत अवघड आहे. कारण केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून आरक्षणाच्या बाबतीतील राज्य सरकारांचे अधिकारच काढून घेतले आहेत. राज्याला आता कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तसे द्यायचे असल्यास घटना दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मराठ्यांना कायद्याच्या चाैकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी, यासाठी येथून पुढे पाठपुरावा करावा लागणार आहे.

चौकट

महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण

कोल्हापुरातून मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग फुंकताना आंबेडकर व संभाजीराजे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, आमदार, खासदार, मंत्री सहभागी झाले होते. आंदोलन मराठ्यांचे असलेतरी त्याला उपस्थितांची मांदियाळी पाहिल्यावर महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण लावण्याची मुहूर्तमेढच रोवली गेल्याचे दिसत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे प्रकाश आंबेडकर यांनी मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपची ‘बी टीम’ म्हणूनही त्यांच्यावर टीका झाली. वंचितमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे बरेचसे उमेदवारी कमी मतांनी पराभूत झाल्याने आंबेडकर यांच्यावर राग कायम आहे, पण राजकारणात कोणी कायमचा शत्रू वा मित्र नसतो, याच उक्तीप्रमाणे आता बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. दोन्ही कॉंग्रेस व आंबेडकर यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी म्हणून पुन्हा एकदा या सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचे बोलले जात आहे.