शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

जनगणनेनुसार मराठा समाजाला आरक्षण द्या

By admin | Updated: October 7, 2016 01:11 IST

...अन्यथा ‘मराठा’ काय हे समजेल : पाटील

कोल्हापूर : सरकार कोणाचेही असू दे, प्रत्येक वेळी मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरी, कर्जे, आदींमधून डावलले जात आहे. यासह कोपर्डीसारखी घटना घडूनही सरकारने केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली आहे. यासारख्या घटनांमुळे समाजातील युवक- युवतींच्या मनात निराशेचे ढग जमले आहेत. प्रत्येक सरकारकडून मराठा समाजाची हेटाळणी होत आहे. हे कुठे तरी थांबायला हवे. याकरिता जनगणनेनुसार समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मोर्चानंतरही केंद्र व राज्य सरकारला जाग आली नाही तर ‘मराठा’ काय असतो याची प्रचिती येईल, असा इशारा मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी राज्य सरकारला ‘लोकमत’च्या मुलाखतीद्वारे दिला. कोपर्डीसारख्या घटनेमध्ये मराठा मुलीवर अमानुष अत्याचार व तिची हत्या करूनही पोलिसांकडून अद्यापही चार्जशीट दाखल झालेले नाही. याची दखल सरकार कधी घेणार आहे? याशिवाय समाजातील सुशिक्षित मुले, मुली उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. त्यांच्या नोकरी व व्यवसायासाठी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मूक मोर्चानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. कारण मराठा समाज जितक्या शांततेने मोर्चे काढत आहे, पुढील काळात ही शांतता टिकेल, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्तीच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. नोकरीत आरक्षण तसेच अद्यापही केवळ आरक्षण नसल्याने बढती रखडली आहे, अशानाही बढती मिळाली पाहिजे. शेतीमालाला हमीभावही मिळालाच पाहिजे. यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा कुठल्याही जाती-धर्मासाठी नसून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आहे.हे व्हायला हवेअ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास क रून त्यात सुधारणा होणे आवश्यकचोरी, खून, अपहार, घोटाळा, आदी मोठ्या प्रकरणांत अटकपूर्व जामीन मिळू शकतो. मात्र, अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीन मिळत नाही. याचाही विचार होणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या बँकांचे पुनरुज्जीवन व्हावे.व्यवसायात नव्याने येणाऱ्या मराठा युवकांसाठी अर्थसाहाय्य मिळण्यासाठी वित्तीय संस्थांची दारे उघडी करा. व्यावसायिक सरकारी परवानग्याही तत्काळ मिळणे आवश्यक आहे.मराठा समाजातील लोकांसाठी विशेष उद्योग म्हणून अर्थसाहाय्यासह अनुदानही मिळायला हवे. औद्योगिक वसाहतींमध्ये प्लॉट देताना मराठा समाजाला अग्रस्थान द्या.पश्चिम महाराष्ट्र शेतीचा झोन म्हणून विशेष शेतीविषयक उद्योग, व्यवसाय, निर्मिती केंद्र, आदींना प्रोत्साहन द्या.अपेक्षा मराठी उद्योजकांनीही मराठा समाजातील छोट्या व नव्याने येणाऱ्या उद्योजकांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे.प्रत्येक समाजाची एक खासियत आहे. त्याप्रमाणे मराठा समाजही ‘उद्योजक’ समाज म्हणून नावारूपाला यावा, याकरिता सरकारपेक्षा मराठा समाजातील बड्या उद्योजकांनी एकत्र येऊन प्रशिक्षण केंद्रे, जनजागृती केली पाहिजे. मराठा समाज बांधवांनीही मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी भाषातज्ज्ञ, विशेष व्याख्याते यांची विशेष शिबिरे घेऊन नव्या पिढीला मराठी भाषेचे, संस्कृतीचे महत्त्व पटवून द्यावे. भूमिका मराठाशिलेदारांच्या