शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

जनगणनेनुसार मराठा समाजाला आरक्षण द्या

By admin | Updated: October 7, 2016 01:11 IST

...अन्यथा ‘मराठा’ काय हे समजेल : पाटील

कोल्हापूर : सरकार कोणाचेही असू दे, प्रत्येक वेळी मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरी, कर्जे, आदींमधून डावलले जात आहे. यासह कोपर्डीसारखी घटना घडूनही सरकारने केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली आहे. यासारख्या घटनांमुळे समाजातील युवक- युवतींच्या मनात निराशेचे ढग जमले आहेत. प्रत्येक सरकारकडून मराठा समाजाची हेटाळणी होत आहे. हे कुठे तरी थांबायला हवे. याकरिता जनगणनेनुसार समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मोर्चानंतरही केंद्र व राज्य सरकारला जाग आली नाही तर ‘मराठा’ काय असतो याची प्रचिती येईल, असा इशारा मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी राज्य सरकारला ‘लोकमत’च्या मुलाखतीद्वारे दिला. कोपर्डीसारख्या घटनेमध्ये मराठा मुलीवर अमानुष अत्याचार व तिची हत्या करूनही पोलिसांकडून अद्यापही चार्जशीट दाखल झालेले नाही. याची दखल सरकार कधी घेणार आहे? याशिवाय समाजातील सुशिक्षित मुले, मुली उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. त्यांच्या नोकरी व व्यवसायासाठी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मूक मोर्चानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. कारण मराठा समाज जितक्या शांततेने मोर्चे काढत आहे, पुढील काळात ही शांतता टिकेल, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्तीच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. नोकरीत आरक्षण तसेच अद्यापही केवळ आरक्षण नसल्याने बढती रखडली आहे, अशानाही बढती मिळाली पाहिजे. शेतीमालाला हमीभावही मिळालाच पाहिजे. यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा कुठल्याही जाती-धर्मासाठी नसून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आहे.हे व्हायला हवेअ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास क रून त्यात सुधारणा होणे आवश्यकचोरी, खून, अपहार, घोटाळा, आदी मोठ्या प्रकरणांत अटकपूर्व जामीन मिळू शकतो. मात्र, अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीन मिळत नाही. याचाही विचार होणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या बँकांचे पुनरुज्जीवन व्हावे.व्यवसायात नव्याने येणाऱ्या मराठा युवकांसाठी अर्थसाहाय्य मिळण्यासाठी वित्तीय संस्थांची दारे उघडी करा. व्यावसायिक सरकारी परवानग्याही तत्काळ मिळणे आवश्यक आहे.मराठा समाजातील लोकांसाठी विशेष उद्योग म्हणून अर्थसाहाय्यासह अनुदानही मिळायला हवे. औद्योगिक वसाहतींमध्ये प्लॉट देताना मराठा समाजाला अग्रस्थान द्या.पश्चिम महाराष्ट्र शेतीचा झोन म्हणून विशेष शेतीविषयक उद्योग, व्यवसाय, निर्मिती केंद्र, आदींना प्रोत्साहन द्या.अपेक्षा मराठी उद्योजकांनीही मराठा समाजातील छोट्या व नव्याने येणाऱ्या उद्योजकांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे.प्रत्येक समाजाची एक खासियत आहे. त्याप्रमाणे मराठा समाजही ‘उद्योजक’ समाज म्हणून नावारूपाला यावा, याकरिता सरकारपेक्षा मराठा समाजातील बड्या उद्योजकांनी एकत्र येऊन प्रशिक्षण केंद्रे, जनजागृती केली पाहिजे. मराठा समाज बांधवांनीही मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी भाषातज्ज्ञ, विशेष व्याख्याते यांची विशेष शिबिरे घेऊन नव्या पिढीला मराठी भाषेचे, संस्कृतीचे महत्त्व पटवून द्यावे. भूमिका मराठाशिलेदारांच्या