शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

जनगणनेनुसार मराठा समाजाला आरक्षण द्या

By admin | Updated: October 7, 2016 01:11 IST

...अन्यथा ‘मराठा’ काय हे समजेल : पाटील

कोल्हापूर : सरकार कोणाचेही असू दे, प्रत्येक वेळी मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरी, कर्जे, आदींमधून डावलले जात आहे. यासह कोपर्डीसारखी घटना घडूनही सरकारने केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली आहे. यासारख्या घटनांमुळे समाजातील युवक- युवतींच्या मनात निराशेचे ढग जमले आहेत. प्रत्येक सरकारकडून मराठा समाजाची हेटाळणी होत आहे. हे कुठे तरी थांबायला हवे. याकरिता जनगणनेनुसार समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मोर्चानंतरही केंद्र व राज्य सरकारला जाग आली नाही तर ‘मराठा’ काय असतो याची प्रचिती येईल, असा इशारा मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी राज्य सरकारला ‘लोकमत’च्या मुलाखतीद्वारे दिला. कोपर्डीसारख्या घटनेमध्ये मराठा मुलीवर अमानुष अत्याचार व तिची हत्या करूनही पोलिसांकडून अद्यापही चार्जशीट दाखल झालेले नाही. याची दखल सरकार कधी घेणार आहे? याशिवाय समाजातील सुशिक्षित मुले, मुली उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. त्यांच्या नोकरी व व्यवसायासाठी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मूक मोर्चानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. कारण मराठा समाज जितक्या शांततेने मोर्चे काढत आहे, पुढील काळात ही शांतता टिकेल, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्तीच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. नोकरीत आरक्षण तसेच अद्यापही केवळ आरक्षण नसल्याने बढती रखडली आहे, अशानाही बढती मिळाली पाहिजे. शेतीमालाला हमीभावही मिळालाच पाहिजे. यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा कुठल्याही जाती-धर्मासाठी नसून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आहे.हे व्हायला हवेअ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास क रून त्यात सुधारणा होणे आवश्यकचोरी, खून, अपहार, घोटाळा, आदी मोठ्या प्रकरणांत अटकपूर्व जामीन मिळू शकतो. मात्र, अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीन मिळत नाही. याचाही विचार होणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या बँकांचे पुनरुज्जीवन व्हावे.व्यवसायात नव्याने येणाऱ्या मराठा युवकांसाठी अर्थसाहाय्य मिळण्यासाठी वित्तीय संस्थांची दारे उघडी करा. व्यावसायिक सरकारी परवानग्याही तत्काळ मिळणे आवश्यक आहे.मराठा समाजातील लोकांसाठी विशेष उद्योग म्हणून अर्थसाहाय्यासह अनुदानही मिळायला हवे. औद्योगिक वसाहतींमध्ये प्लॉट देताना मराठा समाजाला अग्रस्थान द्या.पश्चिम महाराष्ट्र शेतीचा झोन म्हणून विशेष शेतीविषयक उद्योग, व्यवसाय, निर्मिती केंद्र, आदींना प्रोत्साहन द्या.अपेक्षा मराठी उद्योजकांनीही मराठा समाजातील छोट्या व नव्याने येणाऱ्या उद्योजकांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे.प्रत्येक समाजाची एक खासियत आहे. त्याप्रमाणे मराठा समाजही ‘उद्योजक’ समाज म्हणून नावारूपाला यावा, याकरिता सरकारपेक्षा मराठा समाजातील बड्या उद्योजकांनी एकत्र येऊन प्रशिक्षण केंद्रे, जनजागृती केली पाहिजे. मराठा समाज बांधवांनीही मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी भाषातज्ज्ञ, विशेष व्याख्याते यांची विशेष शिबिरे घेऊन नव्या पिढीला मराठी भाषेचे, संस्कृतीचे महत्त्व पटवून द्यावे. भूमिका मराठाशिलेदारांच्या