शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

राखीव बटालियनच्या जवानाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:10 IST

कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस ...

कोल्हापूर : येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुशील सुधाकर भेंडे (वय ३५, रा. खेंडा, पोस्ट कुजबा, ता. कुट्टी, जि. नागपूर ग्रामीण) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.जवान सुशील भेंडे हे २०१३ मध्ये भारत राखीव बटालियन-३ मध्ये भरती झाले. सहा वर्षे त्यांनी सेवा बजावली. भारत राखीव बटालियनचे मुख्य कार्यालय कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात आहे. या बटालियनचे जवान दौंड येथे असतात. या ठिकाणी सेवेत असताना सुशील भेंडे याची एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत वादावादी झाली. १० दिवसांपूर्वी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती; त्यामुळे तो गावी येऊन राहिला होता. जादा ड्यूटी लावल्याच्या तणावातून त्याची अधिकाºयाशी वादावादी झाली होती. निलंबित केल्याने त्याची मानसिकता ढासळली होती. घरीदेखील तो मानसिक तणावाखाली होता. जास्त कोणाशी बोलत नव्हता. सोमवारी सकाळी त्याने शेतामध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले.त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.जवानांना न्याय द्यावाभारत राखीव बटालियनच्या जाचक अटी व त्रासाबद्दल कोणी बोलले, तर त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करून प्रसंगी नोकरी गमवावी लागते. या जवानांची नोकरी २४ तास आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार शासन करीत नाही. जिल्हा बदली १५ वर्षांनी केली आहे. ती १० वर्षांनी करावी, म्हणून जवान शासनदरबारी न्याय मागत आहेत. कामाच्या अतिरिक्ततणावामुळे अनेक जवानांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे, तर काहींनी प्रयत्न केला आहे. त्याचाच सुशील भेंडे बळी आहे. शासनाने या जवानांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जवानांतून होत आहे.