शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला असून, ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला असून, ग्रामपंचायतींच्या या निकालावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची भिस्त राहणार आहे.

राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडीचे एकत्रीकरण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विस्कटले असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी गायब झाली असून, स्थानिक गटातटाच्या आतापर्यंतच्या राजकारणानुसार या निवडणुका होत आहेत.

निकालानंतर सत्तेसाठी महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतींमुळे उमेदवारासह नेतेमंडळींचा कस लागला आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे, मुंबईसह देशभरातून आलेल्यांवर सर्वांच्या नजरा होत्या. त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी काही ठिकाणी वाटदेखील पाहावयास मिळाली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आता चित्र उलट पाहावयास मिळत असून, बाहेरील मतदारांना गावात कसे आणता येईल, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.

...........

ग्रामपंचायत निकालावर झेडचीची भिस्त

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारीदेखील आतापासूनच सुरू झाली आहे. अनेक जणांनी आरक्षण गृहीत धरून फिल्डिंग लावली आहे. अशा मंडळींकडून आघाडीचे नेतृत्व केले जात आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीवरच भविष्यातील राजकीय गणिते महत्त्वाची समजली जात आहेत.

वर्चस्वाला कडवे आव्हान

ग्रामपंचायतीची ही निवडणूक तरुणांनी आपल्या हाती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या २० ते २५ वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या हातात ठेवणाऱ्या अनेक प्रस्थापितांसमोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे.