शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला असून, ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला असून, ग्रामपंचायतींच्या या निकालावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची भिस्त राहणार आहे.

राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडीचे एकत्रीकरण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विस्कटले असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी गायब झाली असून, स्थानिक गटातटाच्या आतापर्यंतच्या राजकारणानुसार या निवडणुका होत आहेत.

निकालानंतर सत्तेसाठी महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतींमुळे उमेदवारासह नेतेमंडळींचा कस लागला आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे, मुंबईसह देशभरातून आलेल्यांवर सर्वांच्या नजरा होत्या. त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी काही ठिकाणी वाटदेखील पाहावयास मिळाली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आता चित्र उलट पाहावयास मिळत असून, बाहेरील मतदारांना गावात कसे आणता येईल, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.

...........

ग्रामपंचायत निकालावर झेडचीची भिस्त

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारीदेखील आतापासूनच सुरू झाली आहे. अनेक जणांनी आरक्षण गृहीत धरून फिल्डिंग लावली आहे. अशा मंडळींकडून आघाडीचे नेतृत्व केले जात आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीवरच भविष्यातील राजकीय गणिते महत्त्वाची समजली जात आहेत.

वर्चस्वाला कडवे आव्हान

ग्रामपंचायतीची ही निवडणूक तरुणांनी आपल्या हाती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या २० ते २५ वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या हातात ठेवणाऱ्या अनेक प्रस्थापितांसमोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे.