शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला असून, ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागला असून, ग्रामपंचायतींच्या या निकालावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची भिस्त राहणार आहे.

राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडीचे एकत्रीकरण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विस्कटले असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी गायब झाली असून, स्थानिक गटातटाच्या आतापर्यंतच्या राजकारणानुसार या निवडणुका होत आहेत.

निकालानंतर सत्तेसाठी महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतींमुळे उमेदवारासह नेतेमंडळींचा कस लागला आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे, मुंबईसह देशभरातून आलेल्यांवर सर्वांच्या नजरा होत्या. त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी काही ठिकाणी वाटदेखील पाहावयास मिळाली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आता चित्र उलट पाहावयास मिळत असून, बाहेरील मतदारांना गावात कसे आणता येईल, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.

...........

ग्रामपंचायत निकालावर झेडचीची भिस्त

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारीदेखील आतापासूनच सुरू झाली आहे. अनेक जणांनी आरक्षण गृहीत धरून फिल्डिंग लावली आहे. अशा मंडळींकडून आघाडीचे नेतृत्व केले जात आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकीवरच भविष्यातील राजकीय गणिते महत्त्वाची समजली जात आहेत.

वर्चस्वाला कडवे आव्हान

ग्रामपंचायतीची ही निवडणूक तरुणांनी आपल्या हाती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या २० ते २५ वर्षांपासून गावातील सत्ता आपल्या हातात ठेवणाऱ्या अनेक प्रस्थापितांसमोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिले आहे.