शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

हद्दवाढीबाबत आठवड्यात अहवाल देणार

By admin | Updated: January 5, 2016 01:03 IST

जिल्हाधिकारी : हद्दवाढ समर्थनार्थ कृती समितीचे निवेदन; सकारात्मक अहवाल पाठविण्याची मागणी

कोल्हापूर : हद्दवाढीच्या समर्थनार्थ कृती समिती, विरोधातील कृती समिती व औद्योगिक क्षेत्रातील लोकांशी यापूर्वी चर्चा झाली आहे. त्यानुसार हद्दवाढीसंदर्भातील अहवाल अभिप्रायासह येत्या सात दिवसांत शासनाला पाठवून देऊ. या अभिप्रायमध्ये काय असेल हे आताच सांगणे शक्य नाही. कारण अभिप्रायमधील म्हणणे सादर करण्यापूर्वीच बाहेर आल्यास दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अभिप्राय ज्या दिवशी पाठविला जाईल त्या दिवशी त्याची सर्व माहिती सर्वांना मिळेलच, अशी माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिली. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे महापौर अश्विनी रामाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना हद्दवाढ तातडीने करण्याबाबत निवेदन दिले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी कोल्हापूरला संघर्ष आणि आंदोलनाशिवाय काहीच मिळालेले नाही हा इतिहास आहे. आता कोणतीही आचारसंहिता असण्याचे कारण नाही. त्यामुळे हद्दवाढीसाठी आंदोलनाची वाट बघू नका, हे आमचे काम करा आणि शासनाला सकारात्मक अहवाल पाठवा, अन्यथा जनप्रक्षोभ वाढून आंदोलन सुरू होईल, असा इशारा, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने निवेदनाद्वारे दिला. माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूरला लढल्याशिवाय आतापर्यंत काहीच मिळालेले नाही. त्यामुळे हद्दवाढीबाबतही असे काही करायला लावू नका. याबाबतचा सकारात्मक अहवाल पाठवून आम्हाला सहकार्य करा. हा अहवाल देताना प्रस्तावित गावापैकी एकही गाव वगळले जाणार नाही हे पहा. नगरसेवक शारंगधर देशमुख म्हणाले, राज्यातील कोल्हापूर हे एकमेव असे शहर आहे की जिथे शून्य आद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या प्रस्तावात गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसीचा समावेश करण्यात आला आहे. निवासराव साळोखे म्हणाले, मर्यादित कार्यक्षेत्रामुळे शहर विस्तारायला आता जागा राहिलेली नाही. त्यासाठी हद्दवाढ अनिवार्य आहे. ज्यांना विरोध करायचा आहे ते करू देत, जिल्हाधिकाऱ्यांनी हद्दवाढीच्या बाजूने सकारात्मक अहवाल शासनाला द्यावा. शेजारील ग्रामीण भागात राहणारे महापालिकेच्या सुविधांचा फायदा घेतात पण हद्दवाढीत यायला नको ही भूमिका चुकीची आहे. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार असला तरी इतरांवर त्याचा ताण पडतो हे त्यांनी पाहिले पाहिजे. बाबा इंदूलकर म्हणाले, वाढ ही नैसर्गिक असते त्यानुसार शहराची हद्दवाढ गरजेची आहे. ग्रामीण भागातील शेतीव्यवसायाव्यतिरिक्त बहुतांश लोक व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त शहरात येतात. त्यामुळे हद्दवाढीमुळे कृषी व्यवस्था धोक्यात येईल असे म्हणणे चुकीचे आहे. माजी नगरसेवक राजेश लाटकर म्हणाले, हद्दवाढीबाबत शहरी व ग्रामीण हा विषय संपणार नाही. गेल्या ६६ वर्षांत शहराची हद्दवाढ झालेली नाही. महापालिकेची अवस्था ही ६ वर्षांच्या पोलिओग्रस्त बालकासारखी आहे. कारण महापालिकेचे वय हे ६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याची वाढच न झाल्याने ती ६ वर्षांच्या बालकासारखी राहिली आहे. दिलीप देसाई म्हणाले, महापालिका स्थापन होताना शासनाकडून ज्या अटी व शर्ती घालण्यात आल्या. त्यामध्ये शहराच्या २२ कि.मी.च्या परिघातील भाग घ्यावा असे म्हटले आहे. त्या अटीचे पालन झालेले नाही ते व्हावे. शिष्टमंडळात उपमहापौर शमा मुल्ला, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, महादेव पाटील, रमेश मोरे, सुरेश जरग, सुनिल देसाई, अशोक भंडारे यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक व नगरसेविकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)