शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीबाबत आठवड्यात अहवाल देणार

By admin | Updated: January 5, 2016 01:03 IST

जिल्हाधिकारी : हद्दवाढ समर्थनार्थ कृती समितीचे निवेदन; सकारात्मक अहवाल पाठविण्याची मागणी

कोल्हापूर : हद्दवाढीच्या समर्थनार्थ कृती समिती, विरोधातील कृती समिती व औद्योगिक क्षेत्रातील लोकांशी यापूर्वी चर्चा झाली आहे. त्यानुसार हद्दवाढीसंदर्भातील अहवाल अभिप्रायासह येत्या सात दिवसांत शासनाला पाठवून देऊ. या अभिप्रायमध्ये काय असेल हे आताच सांगणे शक्य नाही. कारण अभिप्रायमधील म्हणणे सादर करण्यापूर्वीच बाहेर आल्यास दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अभिप्राय ज्या दिवशी पाठविला जाईल त्या दिवशी त्याची सर्व माहिती सर्वांना मिळेलच, अशी माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिली. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे महापौर अश्विनी रामाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना हद्दवाढ तातडीने करण्याबाबत निवेदन दिले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी कोल्हापूरला संघर्ष आणि आंदोलनाशिवाय काहीच मिळालेले नाही हा इतिहास आहे. आता कोणतीही आचारसंहिता असण्याचे कारण नाही. त्यामुळे हद्दवाढीसाठी आंदोलनाची वाट बघू नका, हे आमचे काम करा आणि शासनाला सकारात्मक अहवाल पाठवा, अन्यथा जनप्रक्षोभ वाढून आंदोलन सुरू होईल, असा इशारा, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने निवेदनाद्वारे दिला. माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, कोल्हापूरला लढल्याशिवाय आतापर्यंत काहीच मिळालेले नाही. त्यामुळे हद्दवाढीबाबतही असे काही करायला लावू नका. याबाबतचा सकारात्मक अहवाल पाठवून आम्हाला सहकार्य करा. हा अहवाल देताना प्रस्तावित गावापैकी एकही गाव वगळले जाणार नाही हे पहा. नगरसेवक शारंगधर देशमुख म्हणाले, राज्यातील कोल्हापूर हे एकमेव असे शहर आहे की जिथे शून्य आद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या प्रस्तावात गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसीचा समावेश करण्यात आला आहे. निवासराव साळोखे म्हणाले, मर्यादित कार्यक्षेत्रामुळे शहर विस्तारायला आता जागा राहिलेली नाही. त्यासाठी हद्दवाढ अनिवार्य आहे. ज्यांना विरोध करायचा आहे ते करू देत, जिल्हाधिकाऱ्यांनी हद्दवाढीच्या बाजूने सकारात्मक अहवाल शासनाला द्यावा. शेजारील ग्रामीण भागात राहणारे महापालिकेच्या सुविधांचा फायदा घेतात पण हद्दवाढीत यायला नको ही भूमिका चुकीची आहे. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार असला तरी इतरांवर त्याचा ताण पडतो हे त्यांनी पाहिले पाहिजे. बाबा इंदूलकर म्हणाले, वाढ ही नैसर्गिक असते त्यानुसार शहराची हद्दवाढ गरजेची आहे. ग्रामीण भागातील शेतीव्यवसायाव्यतिरिक्त बहुतांश लोक व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त शहरात येतात. त्यामुळे हद्दवाढीमुळे कृषी व्यवस्था धोक्यात येईल असे म्हणणे चुकीचे आहे. माजी नगरसेवक राजेश लाटकर म्हणाले, हद्दवाढीबाबत शहरी व ग्रामीण हा विषय संपणार नाही. गेल्या ६६ वर्षांत शहराची हद्दवाढ झालेली नाही. महापालिकेची अवस्था ही ६ वर्षांच्या पोलिओग्रस्त बालकासारखी आहे. कारण महापालिकेचे वय हे ६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याची वाढच न झाल्याने ती ६ वर्षांच्या बालकासारखी राहिली आहे. दिलीप देसाई म्हणाले, महापालिका स्थापन होताना शासनाकडून ज्या अटी व शर्ती घालण्यात आल्या. त्यामध्ये शहराच्या २२ कि.मी.च्या परिघातील भाग घ्यावा असे म्हटले आहे. त्या अटीचे पालन झालेले नाही ते व्हावे. शिष्टमंडळात उपमहापौर शमा मुल्ला, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, महादेव पाटील, रमेश मोरे, सुरेश जरग, सुनिल देसाई, अशोक भंडारे यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक व नगरसेविकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)