शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाºयांचा अहवाल निष्कर्षाविनाच--अंबाबाई ‘पुजारी हटाओ’ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:09 IST

कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ मागणी संदर्भातील

ठळक मुद्दे: शासनाला आज सादर होणारएखाद्या प्रकरणाचा अहवाल बनवताना त्याचा शेवट विशिष्ट निष्कर्षाने किंवा सल्ल्याने पूर्ण होतोदेवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी मांडलेले म्हणणे पुराव्यांच्या कागदपत्रांनिशी सादर

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ मागणी संदर्भातील जिल्हाधिकाºयांचा ३० पानी अहवाल कोणत्याही निष्कर्षाविना आज, शनिवारी शासनाच्या न्याय व विधि खात्याला सादर होणार आहे. या अहवालात संघर्ष समिती, देवस्थान समिती आणि श्रीपूजकांचे म्हणणे मांडून पुढील निर्णय शासनाने घ्यावा, असे नमूद केले आहे. मात्र, यामुळे त्यांच्या अहवालाकडे डोळे लावून बसलेल्या अंबाबाई भक्तांचा भ्रमनिरासच झाला आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला ९ जूनला घागरा-चोली परिधान केल्यानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ आंदोलन सुरू झाले. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यापुढे सुनावणी प्रक्रिया होऊन तीन महिन्यांच्या आत त्यांनी शासनाच्या न्याय व विधि खात्याला अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. त्यानुसार अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व श्रीपूजकांनी आपले म्हणणे, न्यायालयीन खटले, वाद, परंपरा, पुरावे व कागदपत्रांनिशी जिल्हाधिकाºयांपुढे सादर केले. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी तयार होऊन त्यावर जिल्हाधिकाºयांची सही झाली.

एखाद्या प्रकरणाचा अहवाल बनवताना त्याचा शेवट विशिष्ट निष्कर्षाने किंवा सल्ल्याने पूर्ण होतो. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीदेखील आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांचा अहवाल आल्यानंतर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी कायदा करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणातही जिल्हाधिकाºयांचा अहवाल या दृष्टीने सकारात्मक निष्कर्षांसह शासनाच्या न्याय व विधि खात्याला सादर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, हा ३० पानी अहवाल कोणत्याही निष्कर्षांशिवाय शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात केवळ अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती, देवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी मांडलेले म्हणणे पुराव्यांच्या कागदपत्रांनिशी सादर करण्यात आले आहे व पुढील निर्णय शासनाने घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे.निष्कर्ष का नाही..?जिल्हाधिकाºयांपुढे सुरू असलेली सुनावणी प्रक्रिया बेकायदेशीर असून, त्याला स्थगिती मिळावी यासाठी श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. तो फेटाळल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा विषय आता न्यायप्रविष्ट असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या अहवालाकडे डोळे लावून बसलेल्या अंबाबाई भक्तांचा भ्रमनिरास झाला. 

पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार झालेल्या सुनावणीत अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ मागणीसंदर्भात संघर्ष समिती, देवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी मांडलेले म्हणणे पुराव्यांच्या कागदपत्रांनिशी सादर केले आहे. अहवालात तिन्ही बाजूंचे म्हणणे मांडून पुढील निर्णय शासनाने घ्यावा, असे सुचविले आहे.- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी