शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

जिल्हाधिकाºयांचा अहवाल निष्कर्षाविनाच--अंबाबाई ‘पुजारी हटाओ’ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:09 IST

कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ मागणी संदर्भातील

ठळक मुद्दे: शासनाला आज सादर होणारएखाद्या प्रकरणाचा अहवाल बनवताना त्याचा शेवट विशिष्ट निष्कर्षाने किंवा सल्ल्याने पूर्ण होतोदेवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी मांडलेले म्हणणे पुराव्यांच्या कागदपत्रांनिशी सादर

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ मागणी संदर्भातील जिल्हाधिकाºयांचा ३० पानी अहवाल कोणत्याही निष्कर्षाविना आज, शनिवारी शासनाच्या न्याय व विधि खात्याला सादर होणार आहे. या अहवालात संघर्ष समिती, देवस्थान समिती आणि श्रीपूजकांचे म्हणणे मांडून पुढील निर्णय शासनाने घ्यावा, असे नमूद केले आहे. मात्र, यामुळे त्यांच्या अहवालाकडे डोळे लावून बसलेल्या अंबाबाई भक्तांचा भ्रमनिरासच झाला आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला ९ जूनला घागरा-चोली परिधान केल्यानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ आंदोलन सुरू झाले. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यापुढे सुनावणी प्रक्रिया होऊन तीन महिन्यांच्या आत त्यांनी शासनाच्या न्याय व विधि खात्याला अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. त्यानुसार अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व श्रीपूजकांनी आपले म्हणणे, न्यायालयीन खटले, वाद, परंपरा, पुरावे व कागदपत्रांनिशी जिल्हाधिकाºयांपुढे सादर केले. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी तयार होऊन त्यावर जिल्हाधिकाºयांची सही झाली.

एखाद्या प्रकरणाचा अहवाल बनवताना त्याचा शेवट विशिष्ट निष्कर्षाने किंवा सल्ल्याने पूर्ण होतो. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीदेखील आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाºयांचा अहवाल आल्यानंतर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी कायदा करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणातही जिल्हाधिकाºयांचा अहवाल या दृष्टीने सकारात्मक निष्कर्षांसह शासनाच्या न्याय व विधि खात्याला सादर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, हा ३० पानी अहवाल कोणत्याही निष्कर्षांशिवाय शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात केवळ अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती, देवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी मांडलेले म्हणणे पुराव्यांच्या कागदपत्रांनिशी सादर करण्यात आले आहे व पुढील निर्णय शासनाने घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे.निष्कर्ष का नाही..?जिल्हाधिकाºयांपुढे सुरू असलेली सुनावणी प्रक्रिया बेकायदेशीर असून, त्याला स्थगिती मिळावी यासाठी श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. तो फेटाळल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा विषय आता न्यायप्रविष्ट असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या अहवालाकडे डोळे लावून बसलेल्या अंबाबाई भक्तांचा भ्रमनिरास झाला. 

पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार झालेल्या सुनावणीत अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ मागणीसंदर्भात संघर्ष समिती, देवस्थान समिती आणि श्रीपूजकांनी मांडलेले म्हणणे पुराव्यांच्या कागदपत्रांनिशी सादर केले आहे. अहवालात तिन्ही बाजूंचे म्हणणे मांडून पुढील निर्णय शासनाने घ्यावा, असे सुचविले आहे.- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी