शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गुन्हा नोंदवा नाहीतर काय करायचे ते करा मोर्चा काढणारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST

: शिंदेवाडी येथे सभा मुरगूड : पूरग्रस्तांच्या नुकसानीकडे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे वेदनादायी आहे. त्यामुळे शासनाकडून भरीव ...

: शिंदेवाडी येथे सभा

मुरगूड : पूरग्रस्तांच्या नुकसानीकडे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे वेदनादायी आहे. त्यामुळे शासनाकडून भरीव नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या आग्रही मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारच, कोणतेही कारण सांगून गुन्हे नोंदवा नाहीतर काय करायचे ते करा अगदी अफगाणिस्थानने भारताबरोबर युद्ध केले तरी ठरलेला विराट मोर्चा हा काढणारच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शिंदेवाडी (ता. कागल) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिंदेवाडीचे माजी सरपंच व बिद्री कारखान्याचे संचालक दत्तात्रय खराडे होते. सरपंच परिषद व चिकोत्रा खोरा संघर्ष समितीने आक्रोश मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.

मी सरकार विरोधी आंदोलन करतोय म्हणून शेट्टींनी आघाडी सोडली की काय, अशी चर्चा होईल पण शेतकऱ्यांसाठी राजकारण हित कधीच पाहणार नसून विराट मोर्चा काढून सरकारला गुडघे टेकावयाला भाग पाडू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, यमगेचे सरपंच दिलीपसिंह पाटील,कॉ.अशोक चौगले, सुरुपलीचे उपसरपंच बाळासोा मोरे, बाणगेचे सरपंच रमेश सावंत,निवृत्ती पाटील, सरपंच परिषदेचे दयानंद पाटील, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, माजी उपसभापती अजित पवार, अध्यक्ष दत्तात्रय खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष बाळासो भराडे, युवा अध्यक्ष शिवाजी कमळकर आदी प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार

कोल्हापूरच्या पुराला कर्नाटकातील कृष्णा नदीवरील मांजरी अंकलीदरम्यानचा पुलाचा भरावसुद्धा कारणीभूत आहे त्यामुळे येथे मोठमोठ्या कमानी तयार करण्याच्या मागणीसाठी आपण येत्या काही दिवसांत बेळगावचे जिल्हाधिकारी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले

फोटो ओळ

शिंदेवाडी (ता. कागल) येथील सभेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व्यासपीठावर ‘बिद्री’चे संचालक दत्तात्रय खराडे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, अजित पवार, बाळासोा पाटील, जनार्दन पाटील