शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

टोलसाठी दांडगावा केल्यास तक्रार द्या

By admin | Updated: June 15, 2014 01:48 IST

सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समिती

कोल्हापूर : एखाद्या नागरिकाने टोल दिला नाही, तर ते गुन्ह्याचे कृत्य ठरत नाही म्हणूनच शहरात जर आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरू केल्यास टोल देऊ नका. जर टोलसाठी कोणी अडवणूक केली, दांडगावा केला तर थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार द्या, असे आवाहन आज, शनिवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीतर्फे करण्यात आले. आयआरबी कंपनीने कोणत्याही क्षणी टोलवसुली सुरू करण्याची तयारी केली आहे. टोल विरोधी कृती समितीने आजही टोलला ठाम विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी कृती समितीने नागरिकांना कायदेशीर भाषा समजावी या हेतूने पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले की, ‘टोल दिला नाही, तर तो गुन्हा ठरत नाही. कोणत्याही नागरिकाला मुक्तपणे फिरण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे कोणी टोलवसुलीसाठी नागरिकांच्या मुक्त फिरण्यात अडथळा आणत असेल, दांडगावा करीत असेल, बेकायदेशीर अटकाव करीत असेल तर तो दखलपात्र गुन्हा ठरतो. म्हणूनच टोलवसुलीचा कोणी आग्रह धरला तर तो देऊ नका. जर अधिकच बळजबरी केली जात असेल, तर संबंधित नागरिकाने पोलिसांकडे तक्रार द्यावी.’ कराराप्रमाणे रस्ते झाले की नाहीत, रस्त्यांचा दर्जा चांगला की खराब आहे, करारातील तरतुदींप्रमाणे कामे झाली आहेत की नाहीत या सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत, असे पानसरे यांनी सांगितले. टोल विरोधातील आंदोलन हे सर्वपक्षीय, सर्वव्यापी असे आहे. आतापर्यंत अनेक पातळीवर आंदोलने लढली जात आहेत. ज्यांना आंदोलनात भागीदारी करता आली नाही, अशांनी टोल न देता प्रवास करावा. टोलसाठी वाहन थांबविले तर टोल देणार नाही, असे सांगा, असे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केले. पत्रकार परिषदेस रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, नगरसेवक सत्यजित कदम, बाबा इंदुलकर, पंडितराव सडोलीकर, नारायण पोवार, बाबा पार्टे, सतीश कांबळे, रघुनाथ कांबळे, बाबा महाडिक, जयकुमार शिंदे, दीपा पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)