शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

शहरातील जमिनी सरासरी रेकनरच्या कक्षेत आणा

By admin | Updated: February 20, 2016 00:43 IST

आरक्षणबाधित शेतकरी : मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : महापालिका मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार टी. डी. आर. वापराच्या नवीन धोरणातील सूत्राने कोल्हापूर शहरातील शेतकऱ्यांच्या आरक्षित जमिनी कवडीमोल ठरणार आहेत. यासाठी या जमिनी सरासरी रेकनर दराच्या कक्षेत आणाव्यात, अशी मागणी शहरातील आरक्षणबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शासनाच्या २८ जानेवारी २०१६ च्या अधिसूचनेतील टी.डी.आर. वापर सूत्र धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शहरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या आरक्षित जमिनी कवडीमोल ठरणार आहेत. प्रतिचौरस फूट १८ ते ५० रुपये इतका कमी दर आहे. याउलट टी.डी.आर. ज्या ठिकाणी वापरता येतो, अशा जागेचा दर २५० ते ३५०० रुपये प्रतिचौरस असल्याने नवीन वापरात येणाऱ्या टी.डी.आर. धोरणाच्या सूत्राने तो कित्येक पटींत द्यावा लागेल. यामुळे टी.डी.आर. खरेदी-विक्री तथा वापर व्यावहारिक होणार नाही. यामुळे आरक्षित जमीनमालकांना त्याचा त्रास होणार आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यभर दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नवीन धोरणामुळे शेतकरी भूमिहीन होत असताना त्याच्या जमिनीचा त्याला योग्य मोबदला मिळणार नसेल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. टी.डी.आर. धोरणामुळे ज्या मोजक्या आरक्षित जागा, ज्यांचा रेकनर दर अधिक प्रमाणात आहे, अशा ठिकाणी निर्माण झालेल्या टी.डी.आर.ची मक्तेदारी निर्माण होईल. या दुप्पट व तिप्पट टी.डी.आर. देण्याच्या धोरणाचा काडीमात्र उपयोग न होता, ज्या जागेचा रेकनर दर अत्यल्प आहे, त्या जागेची काही किंमत होणार नाही. परिणामी, ही संकल्पनाच संपुष्टात येऊन शहराच्या विकासास खीळ बसणार आहे. यासाठी नवीन अधिसूचनेस किमान एक वर्षासाठी स्थगिती द्यावी, अशी मागणी जयवंत पाटील, सुरेश पाटील, स्नेहलकुमार पोवार, अनिल सरनाईक, अमृत कांबळे, अजित गायकवाड, शरद बेडेकर, विक्रम पाटील, संजय केंबळे, धनश्री यादव-पाटील, अर्जुन पारळे, आदी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)