शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

कृषी कायदे, वीज विधेयके रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून तिच्या माथ्यावर लादण्याचा सपाटा लावला आहे. त्याला शेतकरी, शेतमजूर, संघटित, असंघटित कामगारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हे कृषी कायदे, वीज विधयके आणि चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, संयुक्त कामगार संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

जनतेच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने हे मंजूर केलेले कायदे आणि प्रस्तावित विधेयके त्वरित मागे घ्यावीत. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमती सरकार कराचे ओझे लादत असल्याने सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सरकारने अवाजवी कर रद्द करून वरील इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे या समितीच्या शिष्टमंडळाने केली. त्यामध्ये उदय नारकर (अखिल भारतीय किसान सभा), नामदेव गावडे (महाराष्ट्र राज्य किसान सभा), वसंतराव पाटील (जनता दल (धर्मनिरपेक्ष), एस. बी. पाटील (आयटक), प्रा. सुभाष जाधव (सीटू), रवींद्र जाधव (जनता दल (धर्मनिरपेक्ष), सतीशचंद्र कांबळे (भाकप), शंकर काटाळे (माकप), अनंतराव कुलकर्णी (सर्व श्रमिक संघ), बाबूराव कदम (शेकाप), दिलदार मुजावर (एआयवायएफ), बाबा मिठारी, शिवाजी पाटील, अनिल चव्हाण, आदींचा समावेश होता. दरम्यान, या समितीने केलेल्या व्यवहार बंदच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद लाभला.

चौकट

बिंदू चौकात उद्या विधेयकांची होळी

या समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारला विरोध दर्शविण्यासाठी आम्ही शुक्रवारी रॅलीचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ती रद्द केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे उदय नारकर यांनी सांगितले. बिंदू चौकात आम्ही सकाळी साडेदहा ते दुपारी बारा यावेळेत धरणे आंदोलनाद्वारे विरोध दर्शविला. व्यवहार बंद ठेवण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. समितीच्या वतीने रविवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकात प्रस्तावित कृषी कायदे, वीज विधयके, चार कामगार संहितेची प्रतिकात्मक होळी करून निषेध केला जाणार असल्याचे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.

फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.

===Photopath===

260321\26kol_2_26032021_5.jpg

===Caption===

फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी  भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.