शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कृषी कायदे, वीज विधेयके रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून तिच्या माथ्यावर लादण्याचा सपाटा लावला आहे. त्याला शेतकरी, शेतमजूर, संघटित, असंघटित कामगारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हे कृषी कायदे, वीज विधयके आणि चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, संयुक्त कामगार संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

जनतेच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने हे मंजूर केलेले कायदे आणि प्रस्तावित विधेयके त्वरित मागे घ्यावीत. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमती सरकार कराचे ओझे लादत असल्याने सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सरकारने अवाजवी कर रद्द करून वरील इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे या समितीच्या शिष्टमंडळाने केली. त्यामध्ये उदय नारकर (अखिल भारतीय किसान सभा), नामदेव गावडे (महाराष्ट्र राज्य किसान सभा), वसंतराव पाटील (जनता दल (धर्मनिरपेक्ष), एस. बी. पाटील (आयटक), प्रा. सुभाष जाधव (सीटू), रवींद्र जाधव (जनता दल (धर्मनिरपेक्ष), सतीशचंद्र कांबळे (भाकप), शंकर काटाळे (माकप), अनंतराव कुलकर्णी (सर्व श्रमिक संघ), बाबूराव कदम (शेकाप), दिलदार मुजावर (एआयवायएफ), बाबा मिठारी, शिवाजी पाटील, अनिल चव्हाण, आदींचा समावेश होता. दरम्यान, या समितीने केलेल्या व्यवहार बंदच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद लाभला.

चौकट

बिंदू चौकात उद्या विधेयकांची होळी

या समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारला विरोध दर्शविण्यासाठी आम्ही शुक्रवारी रॅलीचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ती रद्द केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे उदय नारकर यांनी सांगितले. बिंदू चौकात आम्ही सकाळी साडेदहा ते दुपारी बारा यावेळेत धरणे आंदोलनाद्वारे विरोध दर्शविला. व्यवहार बंद ठेवण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. समितीच्या वतीने रविवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकात प्रस्तावित कृषी कायदे, वीज विधयके, चार कामगार संहितेची प्रतिकात्मक होळी करून निषेध केला जाणार असल्याचे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.

फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.

===Photopath===

260321\26kol_2_26032021_5.jpg

===Caption===

फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी  भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.