शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे, वीज विधेयके रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकशाही पद्धती पायदळी तुडवत देशातील शेती आणि श्रमिकांचेही जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे जनतेचा विरोध डावलून तिच्या माथ्यावर लादण्याचा सपाटा लावला आहे. त्याला शेतकरी, शेतमजूर, संघटित, असंघटित कामगारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हे कृषी कायदे, वीज विधयके आणि चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, संयुक्त कामगार संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

जनतेच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने हे मंजूर केलेले कायदे आणि प्रस्तावित विधेयके त्वरित मागे घ्यावीत. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमती सरकार कराचे ओझे लादत असल्याने सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सरकारने अवाजवी कर रद्द करून वरील इंधनाचे दर त्वरित कमी करावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे या समितीच्या शिष्टमंडळाने केली. त्यामध्ये उदय नारकर (अखिल भारतीय किसान सभा), नामदेव गावडे (महाराष्ट्र राज्य किसान सभा), वसंतराव पाटील (जनता दल (धर्मनिरपेक्ष), एस. बी. पाटील (आयटक), प्रा. सुभाष जाधव (सीटू), रवींद्र जाधव (जनता दल (धर्मनिरपेक्ष), सतीशचंद्र कांबळे (भाकप), शंकर काटाळे (माकप), अनंतराव कुलकर्णी (सर्व श्रमिक संघ), बाबूराव कदम (शेकाप), दिलदार मुजावर (एआयवायएफ), बाबा मिठारी, शिवाजी पाटील, अनिल चव्हाण, आदींचा समावेश होता. दरम्यान, या समितीने केलेल्या व्यवहार बंदच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद लाभला.

चौकट

बिंदू चौकात उद्या विधेयकांची होळी

या समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारला विरोध दर्शविण्यासाठी आम्ही शुक्रवारी रॅलीचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ती रद्द केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे उदय नारकर यांनी सांगितले. बिंदू चौकात आम्ही सकाळी साडेदहा ते दुपारी बारा यावेळेत धरणे आंदोलनाद्वारे विरोध दर्शविला. व्यवहार बंद ठेवण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. समितीच्या वतीने रविवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकात प्रस्तावित कृषी कायदे, वीज विधयके, चार कामगार संहितेची प्रतिकात्मक होळी करून निषेध केला जाणार असल्याचे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.

फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.

===Photopath===

260321\26kol_2_26032021_5.jpg

===Caption===

फोटो (२६०३२०२१-कोल-किसान समिती निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी  भाऊसाहेब गलांडे यांना नामदेव गावडे यांनी दिले. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, अनिल चव्हाण, दिलदार मुजावर आदी उपस्थित होते.