शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

लोक दारात येण्यापूर्वी रस्ते दुरुस्त करा-- हसिना फरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 21:55 IST

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क करण्याचे आदेश बुधवारी महापौर हसिना फरास यांनी महापालिका अधिकाºयांना दिले;

ठळक मुद्देमहापौरांचे महापालिकेच्या अधिकाºयांना आदेश?खराब रस्त्यांबाबत महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी यांची बैठक ठेकेदारामार्फत पॅचवर्कर्ची कामे करून घ्या. तसेच इतर विभागांत काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी पूर्ववत घेवून पॅचवर्कर्ची कामे पूर्ण करा

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांचे तातडीने पॅचवर्क करण्याचे आदेश बुधवारी महापौर हसिना फरास यांनी महापालिका अधिकाºयांना दिले; परंतु निधी उपलब्ध नसल्याची तसेच कामगार नसल्याची कारणे अधिकाºयांनी सांगताच ‘काहीही करा; पण लोक आमच्या दारात येण्यापूर्वी कामे सुरू करा,’ असा आदेशच महापौरांनी दिला.

बुधवारी महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निधी उपलब्ध नसल्याची कबुली अधिकाºयांनी पदाधिकाºयांसमोर दिली; तर यावर्षीच्या बजेटमधील तर कामे झालीच पाहिजेत; शिवाय गतवर्षी बजेटमध्ये धरण्यात आलेली कामेही तत्काळ सुरू झाली पाहिजेत, असा आग्रह पदाधिकाºयांनी धरला.

यावेळी महापौर फरास यांनी दायित्व कालावधीमध्ये खराब झालेले सर्व रस्ते संबंधित ठेकेदाराकडून पूर्ववत दुरुस्त करून घ्यावेत; तसेच खड्डे तत्काळ पॅचवर्क करून बुजवावेत, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या. शहरातील खड्ड्यांसंदर्भात पाहणी करण्यात आली होती, हे खड्डे तातडीने पॅचवर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रशासनाकडून पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करू, असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही रस्ते पॅचवर्कच्या कामास सुरुवात नाही, पॅचवर्क करण्यासाठी एस्टिमेट तयार करण्यात आले आहे का, मागच्या वर्र्षीची कामे अजून का पूर्ण झालेली नाहीत? असे प्रश्न प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, सभागृह नेता प्रवीण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, सुनील पाटील यांनी उपस्थित केले.

प्रशासनाकडे अपुरे मनुष्यबळ असल्यास ठेकेदारामार्फत पॅचवर्कर्ची कामे करून घ्या. तसेच इतर विभागांत काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी पूर्ववत घेवून पॅचवर्कर्ची कामे पूर्ण करा, ठेकेदारांकडून जुनी कामे प्रथम पूर्ण करूनच नवीन कामांचा ठेका द्या, अशा सूचना उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी केल्या.शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी यावेळी बोलताना एक वर्ष व तीन वर्षे वॉरंटीमध्ये असणारे रस्त्यांचे पॅचवर्क करण्याच्या कामास लवकरच सुरुवात केली जाईल. तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. अतिवृष्टीनंतर खराब झालेल्या रस्त्यांसाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता असून, त्यांची उपलब्धता झाली तर तीही कामे सुरू केली जातील, असे त्यांनी सांगितले.

मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी पॅचवर्कसाठी अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक प्रभागासाठी अडीच लाख रुपये तसेच साडेतीन कोटींच्या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगरसेवक श्रावण फडतारे, मोहन सालपे, नगरसेविका माधुरी लाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, आर. के. जाधव, आदी उपस्थित होते.गतवर्षीची कामेही अपूर्णचगतवर्षी रस्ते पॅचवर्क तसेच प्रभागातील रस्ते करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला अडीच लाख रुपयांची निधी मंजूर केला होता; परंतु त्यातील एकही रुपया उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात सर्व रस्ते खराब झाले आहेत. तातडीने दुरुस्त केले नाहीत तर लोक आमच्या दारात येतील. त्यामुळे तुम्ही काहीही करा; पण कामे सुरू करा, असा आग्रह पदाधिकाºयांनी केला.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग