शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

सोहाळे बंधाऱ्याची डागडुजी युद्धपातळीवर

By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST

गळती काढण्याचे काम : राजीव गांधी पाणी वापर संस्थेचा पुढाकार

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा --लोकवर्गणीअभावी रेंगाळलेल्या सोहाळे बंधाऱ्याची गळती काढण्यासह पाणी अडविण्याचे काम अखेर राजीव गांधी पाणी वापर संस्थेच्या पुढाकाराने मार्गी लागत असून, पुढच्या वर्षी पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होण्यासाठी बंधाऱ्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.जलसंधारण विभागाच्या अखत्यारित रामतीर्थ परिसरात हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या या बंधाऱ्याला गळत्या असल्याने व पाणी अडविण्याकरिता सडलेले लोखंडी बरगे वापरले जात होते. यामुळे सलग चार वर्षे जानेवारी महिन्यात बरग्यांना पाण्याचा दाब न पेलल्याने बरगे निसटून पाणी वाटून जाण्याचा प्रकार घडला. यामुळे या बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असणारा व उन्हाळी पिके घेणारा शेतकरी वर्ग वारंवार अडचणीत आला आहे.राजीव गांधी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सदर बंधारा दुरूस्तीकरिता हालचाली सुरू होत्या; पण शेतकरी वर्गाकडून सुमारे ११ लाख रूपयांची लोकवर्गणी भरली जात नसल्याचे कारण पुढे करून जलसंधारण विभागाने बंधारा दुरूस्तीची वर्क आॅर्डर रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. सोहाळे, बाची, सोहाळेवाडी, साळगाव येथील ५५० शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. बंधाऱ्याची दुरूस्ती सुरू झाल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकरी वर्गाने लोकवर्गणी भरण्यास हिरवा कंदील दाखविल्याने बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे. बंधाऱ्याची गळती काढणे, पाणी अडविण्याकरिता नवीन बरगे वापरणे, इत्यादी कामे हाती घेण्यात आली आहेत. शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन सुरू आहे.बंधाऱ्यात पाणी नाहीसोहाळे बंधाऱ्यात पाणी साठविले गेल्याने याच नदीवर असणाऱ्या साळगाव व देवर्डे बंधाऱ्यात पुरेसे पाणी साठत असते. सोहाळे बंधाऱ्याला गळती लागल्याने साळगाव व देवर्डे हे दोन्ही बंधारे पाण्याअभावी उघडे दिसत आहेत.रामतीर्थ धबधबा बंदयावर्षी सोहाळे बंधाऱ्यात काहीच पाणी नसल्याने रामतीर्थ धबधबाही पूर्णपणे बंद झाला आहे.