शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राणेंना भांडवलदारांकडून आश्वासन : सुधीर सावंत

By admin | Updated: July 23, 2014 21:55 IST

काँग्रेसमधील दलालांनी किंवा भांडवलदारांनी दिले असेल,

वेंगुर्ले : नारायण राणे २००५ मध्ये काँग्रेसमध्ये जाताना त्यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आश्वासन काँग्रेसच्या अध्यक्षा किंवा केंद्रातील नेत्यांनी दिले नव्हते. तर त्यांना काँग्रेसमधील दलालांनी किंवा भांडवलदारांनी दिले असेल, असे विधान शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष कर्नल सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे केले. सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवराज्य पक्षाचे जिल्हा संघटक दीनानाथ वेर्णेकर उपस्थित होते. सन २००३ मध्ये मी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये येणार, असे सांगितले होते. त्यावेळी माझ्यावर हल्लाही झाला होता. काँग्रेसमधील दलालांनी व भांडवलदारांनी मला विरोध करण्यासाठी नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्याशिवाय एकही काँग्रेसचा आमदार निवडणुकीत निवडून आला नाही. मग राणे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे नाटक करून मुख्यमंत्रीपद कसे काय मागतात हे काँगे्रसलाच ठाऊक , असे सावंत म्हणाले. कोकणातील मतदारांनी काँगे्रसच्या विरोधात मत न टाकता राणे यांच्या विरोधातच टाकले आहे. यापुढच्या निवडणुकीत कोकणातील मतदार राणे व त्यांच्या मुलाच्या विरोधात मतदान करणार आहे. त्यामुळे शिवराज्य पक्षात येण्याची आॅफर आमदार दीपक केसरकर यांना दिली असल्याचे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)