शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले

By admin | Updated: January 23, 2015 23:34 IST

शासनाचे दुर्लक्ष : प्रकाशन समितीचे पुनर्गठन नाही; भाजप सरकारचेही दुर्लक्ष

प्रताप महाडिक- कडेगाव -महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाची समिती २०१३ पासून अद्याप पुनर्गठित झालेली नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी या स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले आहे. शिवाय राज्यातील २७ दिग्गज व्यक्तींचे जीवनचरित्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळापुढे धूळ खात पडून असल्याची माहिती मिळाली. २०१३ पूर्वी आघाडी शासनाच्या काळात अस्तित्वात असलेल्या मंडळाने हे प्रस्ताव प्रकाशनासाठी विचाराधीन ठेवले होते. परंतु आता नव्या भाजप शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.आघाडी शासन अस्तित्वात असताना म्हणजे आॅगस्ट २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाची समिती बरखास्त करण्यात आली होती. ही समिती बरखास्त करण्यापूर्वी याच समितीने क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे जीवनचरित्र महाराष्ट्र साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या प्रकल्प समितीच्या बैठकीत प्रकाशनासाठी विचाराधीन ठेवले आहे. तेव्हापासून समिती पुनर्गठित झालेली नाही आणि जीवनचरित्राचे प्रकाशन रखडले आहे.क्रांतिअग्रणींचे जीवनचरित्र ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या पुस्तकांच्या मालिकेतून शासनामार्फत प्रसिध्द व्हावे, यासाठी वांगी येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख औंधे यांनी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला आहे. परंतु शासनाच्या लाल फितीच्या कारभारात प्रकाशन अडकले आहे.वास्तविक युती शासनाची सत्ता आल्यानंतर अशी महत्त्वपूर्ण कामे रखडणार नाहीत, अशी नागरिकांची अपेक्षा होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगता संघर्ष या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींच्या जीवनचरित्रातून नवीन पिढीसमोर येणार आहे, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. भाजप आणि शिवसेना युती शासनाने यातील गांभीर्य ओळखून ही समिती तात्काळ गठित करावी, जी. डी. बापू व नागनाथअण्णा यांची जीवनचरित्रे प्रकाशित करावीत, अशी समाजाच्या सर्वच स्तरातून मागणी होत आहे.क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता युती शासनाने तरी डोळे उघडावेत, अन्यथा रस्त्यावर येऊन संघर्ष करू, मंत्र्यांना जाब विचारू.- गोरख औंधे, सामाजिक कार्यकर्ते, वांगी (ता. कडेगाव)क्रांतिअग्रणी व क्रांतिवीरांचे जीवनचरित्र नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. महाविद्यालये आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची माहिती पोहोचण्याची गरज आहे. शासनाने जीवनचरित्र प्रकाशनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा.- अरुण लाड, क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख, कुंडल