शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

लोकसहभागातून विहिरीचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: January 16, 2015 00:14 IST

वडगावातील रहिवासी : १७ जणांनी टप्प्याटप्याने पाच लाखांचा निधी केला संकलित

सुहास जाधव - वडगाव -वाढीव वसाहतीमध्ये पुरेसे रहिवासी झाल्याशिवाय विकासकामे करणे हे पालिकेसमोर आव्हानात्मकच असते; पण वडगाव येथील दत्तनगरातील १७ जणांनी यावर मात केली. या सर्वांनी पाच लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने संकलित करून विहिरीचे पुनरुज्जीवन केले. येथे पाणीपुरवठ्याची सोय केली. ‘एकत्र येणे म्हणजे, गती, गती म्हणजे प्रगती’ ही म्हण साकारल्याचे दिसते.शहरात वाढीव वसाहतीमध्ये जागा खरेदी ते बांधकाम व राहण्यास जाणे हे दिव्यच असते. येथे संपूर्ण वसाहत विकसित झाल्याशिवाय रस्ते, गटर्स, दिवे, आदींची सुविधा पालिका प्रशासन करू शकत नाही. मात्र, येथे राहणाऱ्या नागरिकांना बांधकाम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने घराचे सुख मिळण्यास ‘वाट’ बघावी लागते.सध्या वडगावसह सर्वच शहरांतील वाढीव वसाहतीमध्ये असे चित्र आहे. नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्याची तरी सोय व्हावी, म्हणून पालिकेचा टँकर आठवड्यातून दोन ते तीन वेळेला येतो. इतर खर्चासाठी विविध ठिकाणांहून पाण्यासाठी भटकंती ठरलेली असते. हा नागरिकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार, प्रयत्न करणे आवश्यक असते. वडगाव-हातकणंगले रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दत्तनगर वसाहत आहे. ही जागा बांधकाम व्यावसायिक आनंदराव पाटील यांनी विकसित केली. येथे ९० भूखंड पाडण्यात आले. अशा वसाहतीमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. या वसाहतीमधील १७ नागरिकांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी मंथन, बैठका घेतल्या. या सर्वांनी या जागेत पडिक व मुजण्याच्या मार्गावर असणाऱ्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जागामालक आनंदराव पाटील व पालिकेची परवानगी घेण्यात आली.यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते. याचा मासिक खर्चही ८० ते ९० रुपये वीज बिलात येतो.२९ जून २०१४ ला पाणीपुरवठ्याचे लोकार्पण झाले. येथील सर्व जाती, धर्माचे लोक गणेश उत्सवासह विविध कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करतात. यामध्ये आणखी इच्छुकांनाही सहभागी करून व्याप्ती वाढवावी. त्यामुळे चांगली योजना सार्थकी लागेल. तसेच नव्याने राहण्यास येणाऱ्या नागरिकांना पाणी योजनेत सहभागी करून घ्यावे, यामुळे लोकसहभागाचा उद्देश सफल होईल.यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते.