शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून विहिरीचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: January 16, 2015 00:14 IST

वडगावातील रहिवासी : १७ जणांनी टप्प्याटप्याने पाच लाखांचा निधी केला संकलित

सुहास जाधव - वडगाव -वाढीव वसाहतीमध्ये पुरेसे रहिवासी झाल्याशिवाय विकासकामे करणे हे पालिकेसमोर आव्हानात्मकच असते; पण वडगाव येथील दत्तनगरातील १७ जणांनी यावर मात केली. या सर्वांनी पाच लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने संकलित करून विहिरीचे पुनरुज्जीवन केले. येथे पाणीपुरवठ्याची सोय केली. ‘एकत्र येणे म्हणजे, गती, गती म्हणजे प्रगती’ ही म्हण साकारल्याचे दिसते.शहरात वाढीव वसाहतीमध्ये जागा खरेदी ते बांधकाम व राहण्यास जाणे हे दिव्यच असते. येथे संपूर्ण वसाहत विकसित झाल्याशिवाय रस्ते, गटर्स, दिवे, आदींची सुविधा पालिका प्रशासन करू शकत नाही. मात्र, येथे राहणाऱ्या नागरिकांना बांधकाम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने घराचे सुख मिळण्यास ‘वाट’ बघावी लागते.सध्या वडगावसह सर्वच शहरांतील वाढीव वसाहतीमध्ये असे चित्र आहे. नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्याची तरी सोय व्हावी, म्हणून पालिकेचा टँकर आठवड्यातून दोन ते तीन वेळेला येतो. इतर खर्चासाठी विविध ठिकाणांहून पाण्यासाठी भटकंती ठरलेली असते. हा नागरिकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार, प्रयत्न करणे आवश्यक असते. वडगाव-हातकणंगले रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दत्तनगर वसाहत आहे. ही जागा बांधकाम व्यावसायिक आनंदराव पाटील यांनी विकसित केली. येथे ९० भूखंड पाडण्यात आले. अशा वसाहतीमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. या वसाहतीमधील १७ नागरिकांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी मंथन, बैठका घेतल्या. या सर्वांनी या जागेत पडिक व मुजण्याच्या मार्गावर असणाऱ्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जागामालक आनंदराव पाटील व पालिकेची परवानगी घेण्यात आली.यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते. याचा मासिक खर्चही ८० ते ९० रुपये वीज बिलात येतो.२९ जून २०१४ ला पाणीपुरवठ्याचे लोकार्पण झाले. येथील सर्व जाती, धर्माचे लोक गणेश उत्सवासह विविध कार्यक्रम एकत्रितपणे साजरे करतात. यामध्ये आणखी इच्छुकांनाही सहभागी करून व्याप्ती वाढवावी. त्यामुळे चांगली योजना सार्थकी लागेल. तसेच नव्याने राहण्यास येणाऱ्या नागरिकांना पाणी योजनेत सहभागी करून घ्यावे, यामुळे लोकसहभागाचा उद्देश सफल होईल.यासाठी सात नागरिकांनी एकत्रितपणे दहा महिने विहिरीतील गाळ उपसणे, आडव्या पारा मारणे, विहिरीभोवती संरक्षण भिंत, विहिरीवर जाळी मारणे, विद्युत कनेक्शन, पाणी उपसा मोटार, आदी कामे केली. तसेच संबंधित नोंदणीकृत नागरिकांच्या घरापर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. दत्तनगरातील नागरिकांच्या या प्रयत्नामुळे घरापर्यंत दररोज अर्धा तास पाणी मिळते.