शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून ५० टक्क्यांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:32 IST

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ ...

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ लोटला असला, तरी १00 टक्केपुनर्वसन झालेले नाही. जमीन व भूखंडांसाठी पसंतीचे अर्ज देऊन १0-१0 वर्षे झाली, तरी शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांचे हात रितेच राहिले आहेत.राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला २००१ मध्ये मंजुरी मिळून, त्याच्या कामाला सुरुवात झाली. अद्याप धरणाचे काम ७० टक्केच झाले असून, पुनर्वसन ६० टक्केझाले आहे. राई, पडसाळी, कंदलगाव ही गावे बाधित होऊन, येथील २४९ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राधानगरी तालुक्यातच राई व कंदलगाव प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये झाले आहे. या वसाहती नुसत्या नावालाच आहेत. येथे वीज, पाणी, रस्ते अशा भौतिक व नागरी सुविधांची वानवा आहे. अजून ४० टक्केप्रकल्पग्रस्तांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. यातील अनेक जणांना जमीनच मिळालेली नाही. ज्यांनी जमीन मागणीसाठी पसंतीचे फॉर्म भरून दिले आहेत. त्यांना आठ-१0 वर्षे उलटली, तरी वाटच बघावी लागत आहे. आठ वर्षांपासून या प्रकल्पाशी संबंधित एकही आदेश निघालेला नाही. शासकीय यंत्रणेच्या समन्वयाचा अभाव व ढिसाळ कारभार, यामुळेच प्रकल्पग्रस्तांवर ही वेळ आली आहे.आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाला १९९६ मध्ये मंजुरी मिळून, प्रत्यक्ष कामाला १९९९ मध्ये सुुरुवात झाली. अद्याप ७५ टक्केकाम झाले असून, सांडवा आणि घळभरणीचे काम बाकी आहे. पुनर्वसन ५० टक्केच झाले आहे. येथील उचंगी, चाफवडे, जेऊर, चितळे ही गावे बाधित झाली असून, २८८ प्रकल्पग्रत पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच १00 टक्केपुनर्वसन व्हावे, अशी प्रकल्पग्रस्तांनी मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने करूनही प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही.