शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून ५० टक्क्यांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:32 IST

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ ...

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ लोटला असला, तरी १00 टक्केपुनर्वसन झालेले नाही. जमीन व भूखंडांसाठी पसंतीचे अर्ज देऊन १0-१0 वर्षे झाली, तरी शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांचे हात रितेच राहिले आहेत.राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला २००१ मध्ये मंजुरी मिळून, त्याच्या कामाला सुरुवात झाली. अद्याप धरणाचे काम ७० टक्केच झाले असून, पुनर्वसन ६० टक्केझाले आहे. राई, पडसाळी, कंदलगाव ही गावे बाधित होऊन, येथील २४९ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राधानगरी तालुक्यातच राई व कंदलगाव प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये झाले आहे. या वसाहती नुसत्या नावालाच आहेत. येथे वीज, पाणी, रस्ते अशा भौतिक व नागरी सुविधांची वानवा आहे. अजून ४० टक्केप्रकल्पग्रस्तांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. यातील अनेक जणांना जमीनच मिळालेली नाही. ज्यांनी जमीन मागणीसाठी पसंतीचे फॉर्म भरून दिले आहेत. त्यांना आठ-१0 वर्षे उलटली, तरी वाटच बघावी लागत आहे. आठ वर्षांपासून या प्रकल्पाशी संबंधित एकही आदेश निघालेला नाही. शासकीय यंत्रणेच्या समन्वयाचा अभाव व ढिसाळ कारभार, यामुळेच प्रकल्पग्रस्तांवर ही वेळ आली आहे.आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाला १९९६ मध्ये मंजुरी मिळून, प्रत्यक्ष कामाला १९९९ मध्ये सुुरुवात झाली. अद्याप ७५ टक्केकाम झाले असून, सांडवा आणि घळभरणीचे काम बाकी आहे. पुनर्वसन ५० टक्केच झाले आहे. येथील उचंगी, चाफवडे, जेऊर, चितळे ही गावे बाधित झाली असून, २८८ प्रकल्पग्रत पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच १00 टक्केपुनर्वसन व्हावे, अशी प्रकल्पग्रस्तांनी मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने करूनही प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही.