शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

निवारा केंद्रात एक हजारहून अधिक नागरिकांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

काेल्हापूर : काेल्हापूर महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या निवारा केंद्रांतून पूरग्रस्त भागातील २९० कुटुंबातील १,०२० नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात ...

काेल्हापूर : काेल्हापूर महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या निवारा केंद्रांतून पूरग्रस्त भागातील २९० कुटुंबातील १,०२० नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. या केंद्रातून वृध्द महिला व गराेदर महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

काेल्हापूर शहराच्या जवळपास चाळीस टक्के भागातील नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरले आहे. दाेन दिवसांपासून २९० कुटुंबांची घरे पाण्यात आहेत. अनेक दुकानेही पाण्यात सापडली आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या शहरातील हजारहून अधिक नागरिकांना महापुरातून बाहेर काढून निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. महापालिकेने जवळपास अठरा निवारा केंद्र सुरु केली आहेत. याशिवाय काही मंगल कार्यालयांतून नागरिकांची राहण्याची साेय करण्यात आली आहे.

सर्वच निवारा केंद्रांमध्ये जनरेटरची साेय, पिण्याच्या पाण्याची साेय, वैद्यकीय सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात आली आली आहे. नागरिकांची चहा, नाष्टा, जेवणाचा साेय महापालिका प्रशासनाने काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून केली आहे.

दसरा चाैकातील मुस्लिम बाेर्डींग येथे ६५ व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे लक्ष्मीपुरी कामगार चाळ तसेच विजापूर, रत्नागिरी येथील नागरिकांचे वास्तव्य आहे. याठिकाणी बैतुलमाल कमिटीसह काही सामाजिक संघटना पूरग्रस्तांना टुथपेस्ट, साबणापासून चहा, जेवणाची व्यवस्था करत आहेत. शिराेली येथील मदरसामध्ये जवळपास २०० नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहेे.

चित्रदुर्ग मठात सुतारवाडा, सीता काॅलनी, शाहूपुरी येथील ५० कुटुंबांतील १९० व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महापालिकेने आरोग्य पथकासह पिण्याचे पाणी, जेवणाची सोय केली आहे. मठात ३५ म्हैशी व सहा गाईंनादेखील आसरा देण्यात आला असून, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था महापालिका तसेच काही संस्थांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने प्रत्येक निवारा केंद्रात जनरेटरसह वैद्यकीय पथकांची नेमणूक केली आहे. सर्व पूरग्रस्तांची दिवसातून दाेनवेळा तपासणी केली जात आहे.

सेंट्रल किचनची सोय व्हावी -

शहरातील निवारा केंद्रातून एकाचवेळी अनेक संस्था, व्यक्ती नाष्टा व जेवणाची सोय करत आहेत. त्यामुळे अन्नाची नासाडी हाेताना दिसत आहे. महापालिका प्रशासनाने डाॅ. विजय पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. ज्यांना पूरग्रस्तांना जेवण द्यायचे आहे, त्यांनी डाॅ. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.