शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

निवारा केंद्रात एक हजारहून अधिक नागरिकांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

काेल्हापूर : काेल्हापूर महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या निवारा केंद्रांतून पूरग्रस्त भागातील २९० कुटुंबातील १,०२० नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात ...

काेल्हापूर : काेल्हापूर महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या निवारा केंद्रांतून पूरग्रस्त भागातील २९० कुटुंबातील १,०२० नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. या केंद्रातून वृध्द महिला व गराेदर महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

काेल्हापूर शहराच्या जवळपास चाळीस टक्के भागातील नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरले आहे. दाेन दिवसांपासून २९० कुटुंबांची घरे पाण्यात आहेत. अनेक दुकानेही पाण्यात सापडली आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या शहरातील हजारहून अधिक नागरिकांना महापुरातून बाहेर काढून निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. महापालिकेने जवळपास अठरा निवारा केंद्र सुरु केली आहेत. याशिवाय काही मंगल कार्यालयांतून नागरिकांची राहण्याची साेय करण्यात आली आहे.

सर्वच निवारा केंद्रांमध्ये जनरेटरची साेय, पिण्याच्या पाण्याची साेय, वैद्यकीय सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात आली आली आहे. नागरिकांची चहा, नाष्टा, जेवणाचा साेय महापालिका प्रशासनाने काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून केली आहे.

दसरा चाैकातील मुस्लिम बाेर्डींग येथे ६५ व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे लक्ष्मीपुरी कामगार चाळ तसेच विजापूर, रत्नागिरी येथील नागरिकांचे वास्तव्य आहे. याठिकाणी बैतुलमाल कमिटीसह काही सामाजिक संघटना पूरग्रस्तांना टुथपेस्ट, साबणापासून चहा, जेवणाची व्यवस्था करत आहेत. शिराेली येथील मदरसामध्ये जवळपास २०० नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहेे.

चित्रदुर्ग मठात सुतारवाडा, सीता काॅलनी, शाहूपुरी येथील ५० कुटुंबांतील १९० व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महापालिकेने आरोग्य पथकासह पिण्याचे पाणी, जेवणाची सोय केली आहे. मठात ३५ म्हैशी व सहा गाईंनादेखील आसरा देण्यात आला असून, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था महापालिका तसेच काही संस्थांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने प्रत्येक निवारा केंद्रात जनरेटरसह वैद्यकीय पथकांची नेमणूक केली आहे. सर्व पूरग्रस्तांची दिवसातून दाेनवेळा तपासणी केली जात आहे.

सेंट्रल किचनची सोय व्हावी -

शहरातील निवारा केंद्रातून एकाचवेळी अनेक संस्था, व्यक्ती नाष्टा व जेवणाची सोय करत आहेत. त्यामुळे अन्नाची नासाडी हाेताना दिसत आहे. महापालिका प्रशासनाने डाॅ. विजय पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. ज्यांना पूरग्रस्तांना जेवण द्यायचे आहे, त्यांनी डाॅ. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.