शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

निवारा केंद्रात एक हजारहून अधिक नागरिकांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

काेल्हापूर : काेल्हापूर महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या निवारा केंद्रांतून पूरग्रस्त भागातील २९० कुटुंबातील १,०२० नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात ...

काेल्हापूर : काेल्हापूर महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या निवारा केंद्रांतून पूरग्रस्त भागातील २९० कुटुंबातील १,०२० नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. या केंद्रातून वृध्द महिला व गराेदर महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

काेल्हापूर शहराच्या जवळपास चाळीस टक्के भागातील नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरले आहे. दाेन दिवसांपासून २९० कुटुंबांची घरे पाण्यात आहेत. अनेक दुकानेही पाण्यात सापडली आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या शहरातील हजारहून अधिक नागरिकांना महापुरातून बाहेर काढून निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. महापालिकेने जवळपास अठरा निवारा केंद्र सुरु केली आहेत. याशिवाय काही मंगल कार्यालयांतून नागरिकांची राहण्याची साेय करण्यात आली आहे.

सर्वच निवारा केंद्रांमध्ये जनरेटरची साेय, पिण्याच्या पाण्याची साेय, वैद्यकीय सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात आली आली आहे. नागरिकांची चहा, नाष्टा, जेवणाचा साेय महापालिका प्रशासनाने काही सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून केली आहे.

दसरा चाैकातील मुस्लिम बाेर्डींग येथे ६५ व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे लक्ष्मीपुरी कामगार चाळ तसेच विजापूर, रत्नागिरी येथील नागरिकांचे वास्तव्य आहे. याठिकाणी बैतुलमाल कमिटीसह काही सामाजिक संघटना पूरग्रस्तांना टुथपेस्ट, साबणापासून चहा, जेवणाची व्यवस्था करत आहेत. शिराेली येथील मदरसामध्ये जवळपास २०० नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहेे.

चित्रदुर्ग मठात सुतारवाडा, सीता काॅलनी, शाहूपुरी येथील ५० कुटुंबांतील १९० व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महापालिकेने आरोग्य पथकासह पिण्याचे पाणी, जेवणाची सोय केली आहे. मठात ३५ म्हैशी व सहा गाईंनादेखील आसरा देण्यात आला असून, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था महापालिका तसेच काही संस्थांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने प्रत्येक निवारा केंद्रात जनरेटरसह वैद्यकीय पथकांची नेमणूक केली आहे. सर्व पूरग्रस्तांची दिवसातून दाेनवेळा तपासणी केली जात आहे.

सेंट्रल किचनची सोय व्हावी -

शहरातील निवारा केंद्रातून एकाचवेळी अनेक संस्था, व्यक्ती नाष्टा व जेवणाची सोय करत आहेत. त्यामुळे अन्नाची नासाडी हाेताना दिसत आहे. महापालिका प्रशासनाने डाॅ. विजय पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. ज्यांना पूरग्रस्तांना जेवण द्यायचे आहे, त्यांनी डाॅ. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.