शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

घळभरणीचे काम थांबवून आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

उत्तूर : ज्या पद्धतीने आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पाचे घळभरणीचे काम गतीने सुरू आहे. त्या पद्धतीने प्रकल्पग्रस्तांच्या ...

उत्तूर :

ज्या पद्धतीने आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पाचे घळभरणीचे काम गतीने सुरू आहे. त्या पद्धतीने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम नाही त्यामुळे घळभरणीचे काम थांबवून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून धरणग्रस्तांनी केली आहे.

प्रकल्पस्थळावर झालेल्या मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पुनर्वसन अधिकारी व धरणग्रस्तांसमवेत पुनर्वसनाबाबत बैठक झाली; मात्र धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत.

धरणाच्या लाभक्षेत्रातील संपादित झालेल्या जमिनीवर स्थगिती आल्याने जमिनी संपादन प्रक्रिया थांबली आहे. महिना झाला तरी संपादित जमिनीवरील स्थगिती आदेश उठलेला नाही.

संकलन रजिस्टरमधील चुका दुरुस्त झाल्या नाहीत. पुनर्वसन कायद्याप्रमाणे जमीन वाटप करा, असा कायदा असताना त्याची पूर्तता झाली नाही. प्रकल्पग्रस्तांची शिल्लक असणारी जमीन संपादित केली आहे. त्या जमिनीचे ६५ टक्के रक्कम भरून घेऊन पर्यायी जमिनीसाठी पात्र ठरवावे. वर्ग - २ च्या जमिनी वर्ग - १ च्या करून मिळाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता कैतान बारदेस्कर यांच्याकडे धरणग्रस्तांनी केली.

निवेदनावर कॉ. संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, महादेव खाडे, राजू देशपांडे, शिवाजी येजरे, बजरंग पुंडपळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

------------------------

फोटो ओळी : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे मागण्यांचे निवेदन प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता कैतानबार देस्कर यांच्याकडे देताना धरणग्रस्त.

क्रमांक : ०४०५२०२१-गड-०१