शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ठराव देताना नियमित, आता थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:38 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्हा बँकेचा वर्षापूर्वी ठराव दाखल करताना नियमित मात्र सध्या थकीत आहे अशा ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्हा बँकेचा वर्षापूर्वी ठराव दाखल करताना नियमित मात्र सध्या थकीत आहे अशा ठरावधारकांना पात्र ठरवायचे की अपात्र, याबाबतचे त्रांगडे होणार आहे. त्याचबरोबर वर्षभराच्या कालावधीत ठरावधारकानेच सभासदत्वाचा राजीनामा दिला असेल, तर तो मतदानास पात्र राहणार का, यासह विविध मुद्यांबाबत सहकार विभागाकडेच उत्तर नसल्याने संस्था प्रतिनिधींमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मे २०२० मध्ये मुदत संपली. त्यामुळे सहकार प्राधीकरणाने डिसेंबर २०१९ पासून बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार कट ऑफ डेट निश्चित करून संलग्न संस्थांकडून ठराव मागवले. ठराव दाखल करण्याची मुदत संपण्यास तीन दिवस अगोदर निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. निवडणूक साधारणत: वर्षभर पुढे गेली. ज्यांनी ठराव दाखल केले नाहीत, त्या संस्थांसाठी सोमवार (दि. २२) पर्यंत मुदत दिली. उर्वरित संस्था प्रतिनिधींचे ठराव दाखल झाले.

मात्र, वर्षभरापूर्वी ठराव दाखल करताना संस्थांसह संबंधित प्रतिनिधी थकबाकीदार नव्हता. जून २०२० ला संबंधित व्यक्ती थकबाकीत असल्यास त्यास मतदानाचा अधिकार मिळणार का, थकबाकीदाराला मतदानाचा अधिकार देता येत नाही, असे कायदा सांगतो. मग संबंधित व्यक्ती थकबाकीदार म्हणायची की नियमित? असा पेच सहकार विभागापुढे आहे. त्याचबरोबर वर्षभराच्या कालावधीत ठरावधारकाचे सभासदत्व रद्द केले असेल अथवा त्याने स्वत:हून राजीनामा दिला असेल तर संबंधित व्यक्तीला ग्राह्य मानायचे का, काही ठरावधारकांनी २०२० ला निवडणूक होणार म्हणून परदेशवारीचे नियाेजन केले होते, त्यांचीही कोंडी झाली आहे. अशा तक्रारी सध्या सहकार विभागाकडे येत आहेत. मात्र, यावर सध्यातरी सहकार विभागाकडे उत्तर नसल्याने संस्था प्रतिनिधींमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

या कारणामुळेच ठराव बदलणे शक्य

संस्थेने नेमणूक केलेला प्रतिनिधी मयत झाला अथवा संबंधित संस्थेची निवडणूक होऊन प्रतिनिधी बदलण्याचा ठराव केला तरच पहिला दिलेला ठराव बदलता येतो.

न्यायालयीन गुंता वाढू शकतो

बँकेची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अशा प्रकारच्या हरकती येणार आहेत. त्यावर सहकार विभागाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा न्यायालयीन गुंता वाढू शकतो.