शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

ठराव देताना नियमित, आता थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:38 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्हा बँकेचा वर्षापूर्वी ठराव दाखल करताना नियमित मात्र सध्या थकीत आहे अशा ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्हा बँकेचा वर्षापूर्वी ठराव दाखल करताना नियमित मात्र सध्या थकीत आहे अशा ठरावधारकांना पात्र ठरवायचे की अपात्र, याबाबतचे त्रांगडे होणार आहे. त्याचबरोबर वर्षभराच्या कालावधीत ठरावधारकानेच सभासदत्वाचा राजीनामा दिला असेल, तर तो मतदानास पात्र राहणार का, यासह विविध मुद्यांबाबत सहकार विभागाकडेच उत्तर नसल्याने संस्था प्रतिनिधींमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मे २०२० मध्ये मुदत संपली. त्यामुळे सहकार प्राधीकरणाने डिसेंबर २०१९ पासून बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार कट ऑफ डेट निश्चित करून संलग्न संस्थांकडून ठराव मागवले. ठराव दाखल करण्याची मुदत संपण्यास तीन दिवस अगोदर निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. निवडणूक साधारणत: वर्षभर पुढे गेली. ज्यांनी ठराव दाखल केले नाहीत, त्या संस्थांसाठी सोमवार (दि. २२) पर्यंत मुदत दिली. उर्वरित संस्था प्रतिनिधींचे ठराव दाखल झाले.

मात्र, वर्षभरापूर्वी ठराव दाखल करताना संस्थांसह संबंधित प्रतिनिधी थकबाकीदार नव्हता. जून २०२० ला संबंधित व्यक्ती थकबाकीत असल्यास त्यास मतदानाचा अधिकार मिळणार का, थकबाकीदाराला मतदानाचा अधिकार देता येत नाही, असे कायदा सांगतो. मग संबंधित व्यक्ती थकबाकीदार म्हणायची की नियमित? असा पेच सहकार विभागापुढे आहे. त्याचबरोबर वर्षभराच्या कालावधीत ठरावधारकाचे सभासदत्व रद्द केले असेल अथवा त्याने स्वत:हून राजीनामा दिला असेल तर संबंधित व्यक्तीला ग्राह्य मानायचे का, काही ठरावधारकांनी २०२० ला निवडणूक होणार म्हणून परदेशवारीचे नियाेजन केले होते, त्यांचीही कोंडी झाली आहे. अशा तक्रारी सध्या सहकार विभागाकडे येत आहेत. मात्र, यावर सध्यातरी सहकार विभागाकडे उत्तर नसल्याने संस्था प्रतिनिधींमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

या कारणामुळेच ठराव बदलणे शक्य

संस्थेने नेमणूक केलेला प्रतिनिधी मयत झाला अथवा संबंधित संस्थेची निवडणूक होऊन प्रतिनिधी बदलण्याचा ठराव केला तरच पहिला दिलेला ठराव बदलता येतो.

न्यायालयीन गुंता वाढू शकतो

बँकेची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अशा प्रकारच्या हरकती येणार आहेत. त्यावर सहकार विभागाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा न्यायालयीन गुंता वाढू शकतो.