शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिनाथ’ची नोंदणीच रद्द

By admin | Updated: March 26, 2015 00:36 IST

विभागीय सहनिबंधकांचा दणका : गृहनिर्माण संस्थेची मालमत्ता ताब्यात घेणार

कोल्हापूर : येथील बहुचर्चित व वादग्रस्त सम्राटनगरातील आदिनाथ गृहनिर्माण संस्थेची नोंदणीच रद्द (‘डी रजिस्ट्रर’) करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी बुधवारी दिले. संस्थेवर ‘शासकीय अभिहस्तांकिती’ (आॅफिशियली असायनी) म्हणून करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांची नेमणूक करून येत्या वर्षभरात सहकारी कायद्याप्रमाणे कारवाई करून मालमत्तेची मालकी निश्चित करण्याचे आदेश दराडे यांनी दिले.याबाबत प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केलेली आणखी एक फसवणुकीची याचिका प्रलंबित असून न्यायालयाच्या निर्णयाकडे संबंधितांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात गाजलेल्या ‘आदर्श’ घोटाळ्याप्रमाणेच हा घोटाळा आहे. ‘आदिनाथ’ संस्थेच्या सभासदत्वाच्या व तेथील बांधकामाच्या अनुषंगाने मूळ मालक निनाद नामदेव इंगवले (रा. श्रीकृपा, पाचगाव शाळेजवळ पाचगांव, कोल्हापूर) यांनी शहर उप निबंधकांकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करून विभागीय सहनिबंधकांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तक्रारदार व सभासदांचे म्हणणे ऐकून दराडे यांनी हा आदेश १९ मार्चला दिला.आदिनाथ गृहनिर्माण संस्थेच्या १२३ सभासदांना ते बेघर आहेत, त्यांचे उत्पन्न २० हजारांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींची गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करण्याची मागणी मुख्य प्रवर्तक रंजना पांडुरंग हंजीकर यांनी २००६ ला शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने ६०० चौरस फूट भूखंड प्रत्येकी सभासदांना देण्यासाठी रि.स.नं.५०८/१, ५०९/१ व ५१२ असे एकूण क्षेत्र ११८६० चौरस मीटर हा भूखंड युएलसीला २००८ मध्ये दिला. २७ आॅगस्ट २००८ ला ‘युएलसी’कडून या लाभार्थ्यांना तो मिळाला. मात्र, जे मूळ बेघर असणाऱ्या सभासदांना हे भूखंड न मिळता १२३ जणांची मूळ यादी बदलून धनदांडग्यांची नावे त्यात घालण्यात आली व जमीन मिळवण्यात आली. जमिनीचा वापर घर बांधणीसाठी व निवासी वापर असा तपशील नोंदविलेला आहे. तथापि, संस्थेने त्याच जागेतील इमारतीमधील फ्लॅट हे निवासी तसेच दुकानगाळे कारणासाठी विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात इंटरनेटवर दिली होती.सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तेथील एका फ्लॅटची किंमत अंदाजे ५० लाखांहून अधिक आहे, अशी तक्रार इंगवले यांनी दिली होती. या संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक संस्था व बेघर सभासदांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी ‘प्रजासत्ताक’ने केली आहे. (प्रतिनिधी) अस्तित्वच संपुष्टातएखादी संस्था अवसायनात काढल्यास तिचे पुनर्जीवन होऊ शकते, परंतु संस्थेची नोंदणीच रद्द केल्याने तिचे अस्तित्व संपुष्टात येते. ‘आदिनाथ’च्या बाबतीच सहकार विभागानेहीच कारवाई केली आहे. नोंदणी रद्द करणे,ही अवसायनाच्या कारवाईचा पुढचा टप्पा मानला जातो.